शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

भार्इंदरमध्ये शिवसेनेचे गांधीगिरीतून फेरीवाल्यांविरोधात आंदोलन; फेरीवाला संघटनेकडून स्टंटबाजीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 17:04 IST

गांधी जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने आ. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मीरा-भार्इंदर फेरीवालामुक्त करण्यासाठी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले.

- राजू काळेभार्इंदर - गांधी जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने आ. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मीरा-भार्इंदर फेरीवालामुक्त करण्यासाठी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. त्यांनी फेरीवाल्यांना गुलाब देऊन रस्त्यावर फेरीवाला व्यवसाय न करण्याचे आवाहन केले. यावर फेरीवाला संघटनांच्या पदाधिका-यांनी मात्र सेनेची ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केला.शहरात फेरीवाला उदंड झाल्याचे वृत्त लोकमतने अनेकदा प्रसिद्ध केले होते. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागल्याने फेरीवाल्यांनी थेट वाहतुकीच्या रस्त्यांसह ना फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्याने नागरिकांसह वाहतुकीला अडचणीचे ठरू लागले आहे. त्यातच मीरारोड रेल्वे पादचारी पुलावरच फेरीवाले बस्तान मांडून प्रवाशांना ये-जा करण्यास अडचण निर्माण करीत आहेत. तर भार्इंदर पूर्व-पश्चिमेकडील उत्तर दिशेच्या पुलाजवळच फेरीवाले जागा अडवून प्रवाशांना अडचण निर्माण करीत आहेत. २९ सप्टेंबरला एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती भार्इंदर व मीरारोड रेल्वे पुलावर होऊ नये, यासाठी फेरीवाल्यांना आळा घालण्याची मागणी होऊ लागली आहे. पूर्ण शहर व रेल्वे परिसरच फेरीवालामुक्त करा, या मागणीसाठी शिवसेनेने सोमवारी भाईंदर व मीरा रोड रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन केले.मीरारोड येथील फेरीवाल्यांना सेनेच्या पदाधिका-यांनी गुलाबाचे पुष्प देऊन त्यांना रस्त्यावर ठाण मांडू नये, असे आवाहन केले. यावेळी आ. प्रताप सरनाईक यांनी यंदा आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलन करीत आहोत, पुढे फेरीवाले पुन्हा बसले तर मात्र गांधीगिरीऐवजी दांडीगिरीने धडा शिकवू, असा इशारा दिला. सेनेच्या आंदोलनानंतरही फेरीवाले बसतात की नाही याची खातरजमा करण्याचे काम करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या किमान दहा पदाधिका-यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनीही सेनेच्या या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, महिला उपजिल्हासंघटक स्नेहल सावंत, शहरप्रमुख धनेश पाटील, प्रशांत पालांडे, प्रकाश मांजरेकर, गटनेता हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेविका नीलम ढवण, शर्मिला बगाजी, अर्चना कदम, स्रेहा पांडे, नगरसेवक दिनेश नलावडे, एलायस बांड्या, उपशहरप्रमुख पपू भिसे, विनायक नलावडे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.जनवादी हॉकर्स सभा या फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर सामंत यांनी मात्र सेनेचे आंदोलन प्रसिद्धीची स्टंटबाजी असल्याचा आरोप केला. देशभरात गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम सुरू असताना सेनेने मात्र गेल्या २७ वर्षांपासून फेरीवाला व्यवसाय करणा-यांचीच स्वच्छता चालविल्याचा टोला त्यांनी सेनेला लगावला. फेरीवाल्यांना केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणांतर्गत पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, त्यानंतरच त्यांना हटवावे, अशी मागणी त्यांनी केली. सेनेच्या भार्इंदर रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या आंदोलनाला रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिका-यांनी परवानगी नसल्याच्या कारणास्तव विरोध केला. त्याकडे दुर्लक्ष करीत सेनेने मात्र आपले आंदोलन सुरूच ठेवले.