शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

वीजदरवाढीविरोधात राज्यभरात आंदोलने, संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 03:04 IST

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नोव्हेंबर २०१६ च्या आदेशानुसार निश्चित केलेले आॅगस्ट २०१८ मधील वीजदर मार्च २०२० पर्यंत कायम ठेवणे, त्यासाठी ३४०० कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यासह अन्य मागण्यांसाठी वीज ग्राहक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नोव्हेंबर २०१६ च्या आदेशानुसार निश्चित केलेले आॅगस्ट २०१८ मधील वीजदर मार्च २०२० पर्यंत कायम ठेवणे, त्यासाठी ३४०० कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यासह अन्य मागण्यांसाठी वीज ग्राहक संघटना आक्रमक झाल्या आहेत.वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितले की, महावितरणचे आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये निश्चित केलेले औद्योगिक वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेने २० टक्के ते ३५ टक्क्यांनी जास्त आहेत. घरगुती, व्यापारी व शेतकरी ग्राहकांचे वीजदरही देशातील सर्वाधिक वीजदर पातळीवर पोहोचले आहेत. आयोगाने सप्टेंबर २०१८ च्या आदेशानुसार २० हजार ६५१ कोटी रुपये म्हणजे १५ टक्के सरासरी दरवाढ लादलीे. त्यापैकी ६ टक्के म्हणजे ८ हजार २६८ कोटी रुपये ग्राहकांकडून मार्च २०२० पर्यंत वसूल केले जातील. उर्वरीत १२ हजार ३८२ कोटी रुपये नियामक मत्ता आकार म्हणून एप्रिल २०२० पासून पुढे व्याजासह ग्राहकांकडून वसूल केले जातील. ही दरवाढ उद्योगांसाठी हानीकारक आहे. त्यामुळे ती रद्द करण्यासंदर्भातील निवेदन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात येईल. कामगारांसह १५ जानेवारीपूर्वी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी व स्थानिक मुख्य/अधीक्षक अभियंता यांना निवेदनही देण्यात येणार आहे.मागण्या : वीजदर शेजारील राज्यांच्या समपातळीवर येईपर्यंत कोणतीही दरवाढ करू नये, औद्योगिक वीज दर स्थिर ठेवण्यासाठी अनुदान द्यावे, उत्पादन खर्च कमी होण्यासाठी उपाययोजना करावी, वीज गळती कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, वीज वापर व वितरण गळती निश्चित करावी.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र