शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

जननी सुरक्षा कागदावरच

By admin | Updated: August 23, 2016 03:39 IST

बालमृत्यू, मातामृत्यू व कुपोषणावरील उपाययोजनेसाठी विविध योजनांच्या सतत होणाऱ्या घोषणा जिल्ह्यात कागदावरच आहेत.

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी गावपाड्यांमधील बालमृत्यू, मातामृत्यू व कुपोषणावरील उपाययोजनेसाठी विविध योजनांच्या सतत होणाऱ्या घोषणा जिल्ह्यात कागदावरच आहेत. यामुळे वर्षभरात १२ माता, ५३ बालके आणि १५८ अर्भकांचे मृत्यू दुर्गम भागातील गावपाड्यांत झाले आहेत. तर, दुर्लक्षितपणामुळे शहापूर व भिवंडी तालुक्यांतील दुर्गम भागातील एक हजार २९० प्रसूत झालेल्या माता जननी सुरक्षेच्या अर्थलाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले. जुलैअखेर तीन मातांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. प्रसूतीदरम्यान एका महिलेचा घरी मृत्यू झाल्याची नोंद असून रक्तदाबाने दोघींचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारे सांगितले जात आहे. तर, गेल्या वर्षी ९ मातांचा मृत्यू झाला. वर्षभरातील या मातामृत्यूसह गेल्या पाच वर्षांत ५९ माता विविध आजारांनी दगावल्याचे सांगितले जात आहे. शहापूर तालुक्यातील मुसई गावात मार्च, मे व जून महिन्यांत तीन बालमृत्यू झाले. या दुर्गमभागाकडे स्थानिक आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष असल्यामुळेच या दोन बालमृत्यंूची आरोग्य विभागाकडे नोंद नसल्याची तक्रार मुख्य सचिवांकडे श्रमिक मुक्ती संघटनेने केली आहे. याशिवाय, पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील सहा वर्षांपर्यंतच्या ५९५ बालकांचा मृत्यू झालेला आहे. यापैकी वर्षभरात ५३ बालके विविध कारणांनी दगावली आहेत. २०१२-१३ मध्ये सर्वाधिक २५६ बालकांचा, तर २०१३-१४ मध्ये २३३ बालकांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद या पाच वर्षांत झाली. याप्रमाणेच एक हजार ६२९ अर्भकांच्या मृत्यूची नोंददेखील आढळली आहे. यातील ३४ अर्भके जुलै महिन्यात दगावली आहेत, तर वर्षभरात १५८ अर्भके मृत झाली आहेत. यामुळे मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्यासाठी एक से बढकर एक योजनांची घोषणा करताना त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा कसा बोजवारा उडालेला आहे, तेदेखील श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे दशरथ वाघ, प्रभाकर देशमुख यांनी मुख्य सचिवांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. आर्थिक वर्ष सुरू होऊन पाच महिने उलटले तरी जिल्ह्याच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या निधीतील केवळ ८.६८ टक्के खर्च झाला आहे. यावरून निधी असूनही अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. जननी सुरक्षा योजनेंतर्गत आदिवासी महिलांना प्रसूतीनंतर सात दिवसांच्या आत ७०० रुपये अनुदान देणे अपेक्षित आहे. मात्र, जुलैअखेरपर्यंत शहापूरमधील ७०९, तर भिवंडी तालुक्यातील ५८१ महिलांना अनुदानित रक्कम मिळाली नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. >फिरत्या आरोग्य पथकांना वाहने नाहीतमुरबाड तालुक्यातील सप्टेंबरअखेर पूर्ण करायच्या ० ते ६ वयोगटांतील बालकांपैकी ४० टक्के बालकांची आरोग्य तपासणी अद्याप झालेली नाही. जिल्ह्यातील बहुतांश फिरत्या आरोग्य पथकांना वाहने दिलेली नसल्यामुळे त्यांना दुर्गम भागात फिरता येत नसल्याचे कारण सांगितले जात आहे. डॉ. कलाम अमृत आहार योजनेंतर्गत डे आहारात नियमानुसार अंडी, केळी व पालेभाज्या दिल्या जात नाही. फक्त डाळभात, रस्साभात दिला जात असल्याचे वास्तव उघड करण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण भागात असलेल्या ६३ सोनोग्राफी केंद्रांपैकी फक्त ३७ केंद्रकार्यरत आहेत. उर्वरित केंद्र बंदच आहेत. डीपीसीच्या निधीतून कुपोषित बालकांच्या पोषण आहारात मळकटलेले लाडू कधीकाळी दिले जात असल्याचे एका व्हीसीडीसी केंद्राला भेट दिल्यानंतर कळल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. अंमलबजावणीऐवजी या योजनांवरील निधीतून भ्रष्टाचाराची कुरणे झाल्याचा आरोप श्रमिक मुक्ती संघटनेने केला.