शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जननी सुरक्षा कागदावरच

By admin | Updated: August 23, 2016 03:39 IST

बालमृत्यू, मातामृत्यू व कुपोषणावरील उपाययोजनेसाठी विविध योजनांच्या सतत होणाऱ्या घोषणा जिल्ह्यात कागदावरच आहेत.

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी गावपाड्यांमधील बालमृत्यू, मातामृत्यू व कुपोषणावरील उपाययोजनेसाठी विविध योजनांच्या सतत होणाऱ्या घोषणा जिल्ह्यात कागदावरच आहेत. यामुळे वर्षभरात १२ माता, ५३ बालके आणि १५८ अर्भकांचे मृत्यू दुर्गम भागातील गावपाड्यांत झाले आहेत. तर, दुर्लक्षितपणामुळे शहापूर व भिवंडी तालुक्यांतील दुर्गम भागातील एक हजार २९० प्रसूत झालेल्या माता जननी सुरक्षेच्या अर्थलाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले. जुलैअखेर तीन मातांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. प्रसूतीदरम्यान एका महिलेचा घरी मृत्यू झाल्याची नोंद असून रक्तदाबाने दोघींचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारे सांगितले जात आहे. तर, गेल्या वर्षी ९ मातांचा मृत्यू झाला. वर्षभरातील या मातामृत्यूसह गेल्या पाच वर्षांत ५९ माता विविध आजारांनी दगावल्याचे सांगितले जात आहे. शहापूर तालुक्यातील मुसई गावात मार्च, मे व जून महिन्यांत तीन बालमृत्यू झाले. या दुर्गमभागाकडे स्थानिक आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष असल्यामुळेच या दोन बालमृत्यंूची आरोग्य विभागाकडे नोंद नसल्याची तक्रार मुख्य सचिवांकडे श्रमिक मुक्ती संघटनेने केली आहे. याशिवाय, पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील सहा वर्षांपर्यंतच्या ५९५ बालकांचा मृत्यू झालेला आहे. यापैकी वर्षभरात ५३ बालके विविध कारणांनी दगावली आहेत. २०१२-१३ मध्ये सर्वाधिक २५६ बालकांचा, तर २०१३-१४ मध्ये २३३ बालकांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद या पाच वर्षांत झाली. याप्रमाणेच एक हजार ६२९ अर्भकांच्या मृत्यूची नोंददेखील आढळली आहे. यातील ३४ अर्भके जुलै महिन्यात दगावली आहेत, तर वर्षभरात १५८ अर्भके मृत झाली आहेत. यामुळे मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्यासाठी एक से बढकर एक योजनांची घोषणा करताना त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा कसा बोजवारा उडालेला आहे, तेदेखील श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे दशरथ वाघ, प्रभाकर देशमुख यांनी मुख्य सचिवांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. आर्थिक वर्ष सुरू होऊन पाच महिने उलटले तरी जिल्ह्याच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या निधीतील केवळ ८.६८ टक्के खर्च झाला आहे. यावरून निधी असूनही अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. जननी सुरक्षा योजनेंतर्गत आदिवासी महिलांना प्रसूतीनंतर सात दिवसांच्या आत ७०० रुपये अनुदान देणे अपेक्षित आहे. मात्र, जुलैअखेरपर्यंत शहापूरमधील ७०९, तर भिवंडी तालुक्यातील ५८१ महिलांना अनुदानित रक्कम मिळाली नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. >फिरत्या आरोग्य पथकांना वाहने नाहीतमुरबाड तालुक्यातील सप्टेंबरअखेर पूर्ण करायच्या ० ते ६ वयोगटांतील बालकांपैकी ४० टक्के बालकांची आरोग्य तपासणी अद्याप झालेली नाही. जिल्ह्यातील बहुतांश फिरत्या आरोग्य पथकांना वाहने दिलेली नसल्यामुळे त्यांना दुर्गम भागात फिरता येत नसल्याचे कारण सांगितले जात आहे. डॉ. कलाम अमृत आहार योजनेंतर्गत डे आहारात नियमानुसार अंडी, केळी व पालेभाज्या दिल्या जात नाही. फक्त डाळभात, रस्साभात दिला जात असल्याचे वास्तव उघड करण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण भागात असलेल्या ६३ सोनोग्राफी केंद्रांपैकी फक्त ३७ केंद्रकार्यरत आहेत. उर्वरित केंद्र बंदच आहेत. डीपीसीच्या निधीतून कुपोषित बालकांच्या पोषण आहारात मळकटलेले लाडू कधीकाळी दिले जात असल्याचे एका व्हीसीडीसी केंद्राला भेट दिल्यानंतर कळल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. अंमलबजावणीऐवजी या योजनांवरील निधीतून भ्रष्टाचाराची कुरणे झाल्याचा आरोप श्रमिक मुक्ती संघटनेने केला.