शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

महाराष्ट्रात सर्वाधिक आंतरजातीय विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:40 IST

पाच वर्षांची आकडेवारी : ५ हजार लग्न

मुंबई : समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न होत असतात. यात आंतरजातीय विवाहाला महत्त्वाचे स्थान दिले जाते. आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जातीभेदाच्या भिंती पुसट करण्यात महाराष्ट्र देशात पुढे असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात पाच वर्षांत २०,४७५ आंतरजातीय विवाह झाले असून ही संख्या देशात सर्वाधिक आहे.महाराष्ट्रात २०१२ ते २०१७ या कालावधीत २०,४७५ आंतरजातीय विवाह झाले. महाराष्ट्रापाठोपाठ केरळचा क्रमांक असून याच कालावधीत तेथे ९,७६० आंतरजातीय विवाह झाल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने म्हटले आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक साहाय्य केले जाते. मुलगा अथवा मुलगी दोघांपैकी एक अनुसूचित जातीचे असल्यास नागरी हक्कांचे संरक्षण म्हणून आर्थिक मदत केली जाते.आंतरजातीय विवाहानंतर नवदाम्पत्यांनी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक समाज कल्याण कार्यालयात लग्नाच्या प्रमाणपत्रासह अनुसूचित जातीची आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास शासनाकडून हा निधी त्यांना दिला जातो.२००६ पासून या योजने अंतर्गत केंद्र सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात असे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या रकमेत वाढ करण्यात आली असून आता १ लाख २५ हजारांचे अर्थसाहाय्य केंद्राकडून केले जाते. शिवाय, विविध राज्य सरकारांकडूनही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून निधी दिला जातो. 

टॅग्स :marriageलग्न