शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिकारी भूमीत शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या, आपच्या राज्यव्यापी शेतकरी, शेतमजूर परिषदेत प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 20:01 IST

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुखांनी विचाराची ज्योत पेटवून ती देशपातळीवर तेवत ठेवली. मात्र आजमितीला शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे क्रांतिकारी भूमीतच शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असल्याची खंत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आशुतोष यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

अमरावती - महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुखांनी विचाराची ज्योत पेटवून ती देशपातळीवर तेवत ठेवली. मात्र आजमितीला शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे क्रांतिकारी भूमीतच शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असल्याची खंत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आशुतोष यांनी रविवारी येथे व्यक्त केली.आपच्या वतीने अमरावतीत आयोजित राज्यव्यापी शेतकरी, शेतमजूर परिषदेला ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना आशुतोष यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारावेळी शेतक-यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला. अवेळी पाऊस, सतत नापिकी, शेती उत्पादनाला भाव नाही, असा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजही अन्नदात्याला आत्महत्या करावी लागत असेल, तर ती राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे.केंद्र सरकार विकासाच्या नावाने विविध प्रकल्पांची पायाभरणी करीत असले तरी या विकासाच्या आर्थिक सुधारणेत शेतक-यांना कुठेही स्थान नाही. देशात झपाट्याने प्रगती केली, हा गवगवा केला जात असून शेतक-यांसाठी सिंचन, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत सुविधा का पुरविली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने उद्योजकांचे ४.५० लाख कोटींचे कर्ज माफ केले तर शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिका का घेतली जात नाही, ही बाब त्यांनी उपस्थित केली. केंद्र सरकार हे सत्ता आणि संपत्तीच्या बळावर चालत असून मोदी, शहा, अंबानी व अदानी यांच्या भयातून देशमुक्त करावा लागेल, अशी भावनिक साद त्यांनी घातली. देशाला सत्ता, संपत्तीच्या भयातून मुक्त करण्यासाठी आपच्या वतीने दिल्ली येथे २६ नोव्हेंबर २०१७ रोजी रामलीला मैदानावर होणा-या मेळाव्यात उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आशुतोष यांनी केले. यावेळी मंचावर आपचे नेते रंगा राचुरे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, गजानन अमदाबादकर, चंद्रकांत वानखडे, पंकज गुप्ता, प्रिती शर्मा-मेमन, आलोक अग्रवाल आदी उपस्थित होते.- तर शिल्पा शेट्टी हिने आत्महत्या का केली नाही?दारू पिण्याचे प्रमाण हे चित्रपटसृष्टीत अधिक आहे. तरीदेखील शिल्पा शेट्टी हिने दारू पिऊन कधी आत्महत्या केली नाही, अशी बोचरी टीका शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे यांनी केंद्र सरकारवर केली. काही दिवसांपूर्वीे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शेतकरी दारू प्राशनाने आत्महत्या करीत असल्याचे उद्गार काढले होते, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. केंद्र सरकार सीमेवर रक्षण करणा-या सैनिकाला अनुदानातून अधिकृत दारू देते तर, अन्न सुरक्षा करणा-या शेतक-यांना वेगळा न्याय का, असा सवाल वानखडे यांनी उपस्थित केला. चित्रपटसृष्टी, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार हेसुद्धा दारू पितात. यापैकी कोणीही दारू पिऊन आत्महत्या केल्या नाहीत. परंतु शेतकरीच का दारू पिऊन आत्महत्या करतो? याचे चिंतन सगळ्यांनाच करावे लागेल. त्यामुळे आता राजकीय पर्याय उभा करावा लागेल, ही बाब त्यांनी आवर्जून मांडली.