शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

क्रांतिकारी भूमीत शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या, आपच्या राज्यव्यापी शेतकरी, शेतमजूर परिषदेत प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 20:01 IST

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुखांनी विचाराची ज्योत पेटवून ती देशपातळीवर तेवत ठेवली. मात्र आजमितीला शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे क्रांतिकारी भूमीतच शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असल्याची खंत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आशुतोष यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

अमरावती - महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुखांनी विचाराची ज्योत पेटवून ती देशपातळीवर तेवत ठेवली. मात्र आजमितीला शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे क्रांतिकारी भूमीतच शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असल्याची खंत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आशुतोष यांनी रविवारी येथे व्यक्त केली.आपच्या वतीने अमरावतीत आयोजित राज्यव्यापी शेतकरी, शेतमजूर परिषदेला ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना आशुतोष यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारावेळी शेतक-यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला. अवेळी पाऊस, सतत नापिकी, शेती उत्पादनाला भाव नाही, असा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजही अन्नदात्याला आत्महत्या करावी लागत असेल, तर ती राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे.केंद्र सरकार विकासाच्या नावाने विविध प्रकल्पांची पायाभरणी करीत असले तरी या विकासाच्या आर्थिक सुधारणेत शेतक-यांना कुठेही स्थान नाही. देशात झपाट्याने प्रगती केली, हा गवगवा केला जात असून शेतक-यांसाठी सिंचन, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत सुविधा का पुरविली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने उद्योजकांचे ४.५० लाख कोटींचे कर्ज माफ केले तर शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिका का घेतली जात नाही, ही बाब त्यांनी उपस्थित केली. केंद्र सरकार हे सत्ता आणि संपत्तीच्या बळावर चालत असून मोदी, शहा, अंबानी व अदानी यांच्या भयातून देशमुक्त करावा लागेल, अशी भावनिक साद त्यांनी घातली. देशाला सत्ता, संपत्तीच्या भयातून मुक्त करण्यासाठी आपच्या वतीने दिल्ली येथे २६ नोव्हेंबर २०१७ रोजी रामलीला मैदानावर होणा-या मेळाव्यात उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आशुतोष यांनी केले. यावेळी मंचावर आपचे नेते रंगा राचुरे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, गजानन अमदाबादकर, चंद्रकांत वानखडे, पंकज गुप्ता, प्रिती शर्मा-मेमन, आलोक अग्रवाल आदी उपस्थित होते.- तर शिल्पा शेट्टी हिने आत्महत्या का केली नाही?दारू पिण्याचे प्रमाण हे चित्रपटसृष्टीत अधिक आहे. तरीदेखील शिल्पा शेट्टी हिने दारू पिऊन कधी आत्महत्या केली नाही, अशी बोचरी टीका शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे यांनी केंद्र सरकारवर केली. काही दिवसांपूर्वीे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शेतकरी दारू प्राशनाने आत्महत्या करीत असल्याचे उद्गार काढले होते, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. केंद्र सरकार सीमेवर रक्षण करणा-या सैनिकाला अनुदानातून अधिकृत दारू देते तर, अन्न सुरक्षा करणा-या शेतक-यांना वेगळा न्याय का, असा सवाल वानखडे यांनी उपस्थित केला. चित्रपटसृष्टी, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार हेसुद्धा दारू पितात. यापैकी कोणीही दारू पिऊन आत्महत्या केल्या नाहीत. परंतु शेतकरीच का दारू पिऊन आत्महत्या करतो? याचे चिंतन सगळ्यांनाच करावे लागेल. त्यामुळे आता राजकीय पर्याय उभा करावा लागेल, ही बाब त्यांनी आवर्जून मांडली.