शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

मच्छी मार्केट कागदावरच!

By admin | Updated: May 30, 2016 02:30 IST

ऐन सकाळी गर्दीच्या वेळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर मच्छी का पानी म्हणत हमालांची धावपळ सुरू असते

ठाणे : ऐन सकाळी गर्दीच्या वेळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर मच्छी का पानी म्हणत हमालांची धावपळ सुरू असते. डोंबिवली पश्चिमेला अगदी रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर मच्छी मार्केट आहे. कल्याण-डोंबिवलीतील मासे खाणाऱ्या खवय्यांना तृप्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत ससून डॉकमधून येथील विक्रेते मासे आणतात. येथे आणल्यानंतर मासे ताजे राहण्यासाठी मात्र या विके्रत्यांना जीवाचा आटापिटा करावा लागतो. अनेकदा ताजे मासे ठेवण्याची सोय न झाल्यास मासे फेकून देण्याची वेळ या विक्रेत्यांवर येते. आलेले ग्राहक केवळ ताजे मासे नसल्याने घेणे टाळतात. डोंबिवलीचे मच्छी मार्केट हे घनश्याम गुप्ते हे प्रथम सरपंच होते तेव्हापासूनचे आहे, असे काहींचे म्हणणे आहे. तर, जाणकारांच्या मते ८० हून अधिक वर्षे जुने, असे हे मार्केट आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने या बाजाराकडे दुर्लक्ष केल्याने दिवसेंदिवस त्याची दुरवस्था अधिकच होत चालली आहे. कितीही स्वच्छता राखली तरीही अस्वच्छताच दिसते. येथून ये-जा करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नाकावर रुमाल ठेवल्याशिवाय जाणे कठीण होते. एकूणच अशा परिस्थितीत डोंबिवलीचे मच्छी मार्केट कधी कात टाकणार, असा सवाल कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना पडला आहे. अशा अस्वच्छ, दुर्गंधी येत असलेल्या मार्केटमध्ये येण्यापेक्षा चौकाचौकांत माशांची विक्री करणाऱ्या विके्रत्यांकडून उघड्यावरील मासळी विकत घेण्याशिवाय येथील नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. येथे ग्राहक आहेत, परंतु अद्ययावत मासळी बाजार नसल्याने रविवारी भल्या पहाटे उठून वसई गाठत तेथून नागरिकांना मासे आणावे लागत आहेत. सध्याच्या मार्केटमध्ये कोल्ड स्टोअरेजची सुविधा नाही, स्वच्छतेसाठी मुबलक पाणी नाही. या अशा परिस्थितीमुळे ग्राहक येथे येण्याचे शक्यतो टाळतात.अद्ययावत मार्केट होण्यासाठी माजी नगरसेवक दिलीप भोईर यांनी याबाबतचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी १९ मे २०११ रोजी महापालिकेला पत्र पाठवले. त्या पत्रात महापालिकेने कल्याणसह डोंबिवली पश्चिमेच्या मच्छी मार्केटच्या पुन:र्बांधणीबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. तो त्यांनी सरकारच्या मत्स्य विभागाकडेही पाठवला होता. या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळावी, असेही त्यांनी सांगितले होते. तो विषय पटलावर घ्यावा, अशी विनंतीही केली होती. या प्रस्तावाला मस्त्य, महासभेची मंजुरी मिळाली. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने भोईर यांनी महापालिकेला पुन्हा ७ मे २०१२ रोजी स्मरणपत्र पाठवले. मंजुरीनंतरही कामाला सुरुवात होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.