शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मच्छी मार्केट कागदावरच!

By admin | Updated: May 30, 2016 02:30 IST

ऐन सकाळी गर्दीच्या वेळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर मच्छी का पानी म्हणत हमालांची धावपळ सुरू असते

ठाणे : ऐन सकाळी गर्दीच्या वेळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर मच्छी का पानी म्हणत हमालांची धावपळ सुरू असते. डोंबिवली पश्चिमेला अगदी रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर मच्छी मार्केट आहे. कल्याण-डोंबिवलीतील मासे खाणाऱ्या खवय्यांना तृप्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत ससून डॉकमधून येथील विक्रेते मासे आणतात. येथे आणल्यानंतर मासे ताजे राहण्यासाठी मात्र या विके्रत्यांना जीवाचा आटापिटा करावा लागतो. अनेकदा ताजे मासे ठेवण्याची सोय न झाल्यास मासे फेकून देण्याची वेळ या विक्रेत्यांवर येते. आलेले ग्राहक केवळ ताजे मासे नसल्याने घेणे टाळतात. डोंबिवलीचे मच्छी मार्केट हे घनश्याम गुप्ते हे प्रथम सरपंच होते तेव्हापासूनचे आहे, असे काहींचे म्हणणे आहे. तर, जाणकारांच्या मते ८० हून अधिक वर्षे जुने, असे हे मार्केट आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने या बाजाराकडे दुर्लक्ष केल्याने दिवसेंदिवस त्याची दुरवस्था अधिकच होत चालली आहे. कितीही स्वच्छता राखली तरीही अस्वच्छताच दिसते. येथून ये-जा करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नाकावर रुमाल ठेवल्याशिवाय जाणे कठीण होते. एकूणच अशा परिस्थितीत डोंबिवलीचे मच्छी मार्केट कधी कात टाकणार, असा सवाल कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना पडला आहे. अशा अस्वच्छ, दुर्गंधी येत असलेल्या मार्केटमध्ये येण्यापेक्षा चौकाचौकांत माशांची विक्री करणाऱ्या विके्रत्यांकडून उघड्यावरील मासळी विकत घेण्याशिवाय येथील नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. येथे ग्राहक आहेत, परंतु अद्ययावत मासळी बाजार नसल्याने रविवारी भल्या पहाटे उठून वसई गाठत तेथून नागरिकांना मासे आणावे लागत आहेत. सध्याच्या मार्केटमध्ये कोल्ड स्टोअरेजची सुविधा नाही, स्वच्छतेसाठी मुबलक पाणी नाही. या अशा परिस्थितीमुळे ग्राहक येथे येण्याचे शक्यतो टाळतात.अद्ययावत मार्केट होण्यासाठी माजी नगरसेवक दिलीप भोईर यांनी याबाबतचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी १९ मे २०११ रोजी महापालिकेला पत्र पाठवले. त्या पत्रात महापालिकेने कल्याणसह डोंबिवली पश्चिमेच्या मच्छी मार्केटच्या पुन:र्बांधणीबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. तो त्यांनी सरकारच्या मत्स्य विभागाकडेही पाठवला होता. या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळावी, असेही त्यांनी सांगितले होते. तो विषय पटलावर घ्यावा, अशी विनंतीही केली होती. या प्रस्तावाला मस्त्य, महासभेची मंजुरी मिळाली. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने भोईर यांनी महापालिकेला पुन्हा ७ मे २०१२ रोजी स्मरणपत्र पाठवले. मंजुरीनंतरही कामाला सुरुवात होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.