शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन बियाणे नापास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 11:15 IST

Agriculutre News : यावर्षी बीज परीक्षण प्रयोगशाळेला सात लाख ३२ हजार ८९१ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होेते.

ठळक मुद्देसात लाख क्विंटल बियाणे झाले प्राप्त पिकाला फटका बसल्याचा परिणाम

- सागर कुटे

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणांचे नियोजन केले होते; परंतु गतवर्षी सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात पीक खराब झाले. बहुतांश सोयाबीनची उगवणक्षमता नसल्याने राज्यात ५० टक्केपेक्षा अधिक सोयाबीन बियाणे नापास झाले. यावर्षी बीज परीक्षण प्रयोगशाळेला सात लाख ३२ हजार ८९१ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होेते.

राज्यात खरीप हंगामासाठी जवळपास ७ ते ८ लाख क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता भासते. या बियाणांच्या पुरवठ्यामध्ये अर्धा वाटा हा महाबीजचा असतो. महाबीजमार्फत राज्यभरात बियाणांचे वितरण केले जाते. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. दरम्यान, राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. बियाणांसाठी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकावर याचा परिणाम झाला. या शेतकऱ्यांकडून बीज परीक्षण प्रयोगशाळेला सात लाख ३२ हजार ८९१ क्विंटल सोयाबीन बियाणे प्राप्त झाले; परंतु प्रक्रिया झाल्यानंतर चार लाख ४२ हजार ४३३ क्विंटल सोयाबीन बियाणे नापास झाले. यातील काही बियाणे काडी-कचरा साफ करून दाना लहान असल्याने प्रक्रियेआधीच काढून टाकण्यात आले होते.

प्रक्रियेसाठी प्राप्त बियाणे

७,३२,८९१ क्विंटल

प्रक्रिया झालेले बियाणे

५,८५,१३१ क्विंटल

चांगले बियाणे

४,८१,१८९ क्विंटल

प्रमाणीकरण झालेले बियाणे

२,९०,४५८

 

८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी

गतवर्षी सोयाबीन बियाणाची राज्यातील ८४ हजार ९४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी नोंदणी करण्यात आली होती; परंतु यातील ८० हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेण्यात आले.

महाबीजची नियोजित उद्दिष्टपूर्ती नाही!

यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे चार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे वितरणाचे उद्दिष्ट होते; परंतु मोठ्या प्रमाणात बियाणे नापास झाले. त्यामुळे राज्यात जवळपास दोन लाख क्विंटल बियाणांचे वितरण केले असून, नियोजित उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही.

 

इतर पिकांचे ५३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणित

राज्यातील परीक्षण प्रयोगशाळेत सोयाबीन सोबत उडीद, मूग, तूर, धान व इतर पिकांचे प्रमाणीकरण केले जाते. यामध्ये सोयाबीनवगळता इतर पिकांचे ५३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणित झाले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAkolaअकोलाFarmerशेतकरी