शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मान्सून ११० टक्क्यांपर्यंत विक्रमी मजल मारणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 07:00 IST

भारतीय हवामान शास्त्र विभागाचा अंदाज; सलगता कायम राहिल्यास जास्तीचा पाऊस पडण्याची शक्यता

- सचिन लुंगसे मुंबई : देशासह राज्यात धो धो कोसळणारा पाऊस रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करीत असतानाच २६ सप्टेंबरपर्यंत देशभरात मान्सूनने १०७ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही टक्केवारी सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक असून, परतीचा पाऊस सुरू होण्यास अद्यापही बहुतांश कालावधी शिल्लक आहे. परिणामी, १०७ टक्क्यांवर पोहोचलेला मान्सून सप्टेंबर महिना संपेपर्यंत ११० टक्क्यांपर्यंत विक्रमी मजल मारेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. या पावसाची नोंद जास्तीचा मान्सून म्हणून केली जाईल.१ जून ते २७ सप्टेंबर या कालावधीत देशभरात ९३१.५ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात मात्र या काळात सरासरी ८६९.४ मिलीमीटर पावसाची नोंद होते. देशात सरासरीच्या तुलनेत अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला असून, ही नोंद ७ टक्के अधिक आहे.राज्यांचा विचार करता राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, गोवा, कर्नाटक, सिक्कीम, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. हिमाचल, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांत सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हरयाणा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि मणिपूर या राज्यांत आतापर्यंत सर्वाधिक कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये अतिरिक्तपेक्षा अधिक पावसाची नोंदमहाराष्ट्राचा विचार करता सोलापूर, बीड, लातूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत सर्वांत कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे या जिल्ह्यांत अतिरिक्तपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, अहमदनगर, जळगाव, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत अतिरिक्त पाऊस नोंदविण्यात आला आहे.उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत आतापर्यंत सर्वसाधारण पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस