शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

मान्सून ११० टक्क्यांपर्यंत विक्रमी मजल मारणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 07:00 IST

भारतीय हवामान शास्त्र विभागाचा अंदाज; सलगता कायम राहिल्यास जास्तीचा पाऊस पडण्याची शक्यता

- सचिन लुंगसे मुंबई : देशासह राज्यात धो धो कोसळणारा पाऊस रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करीत असतानाच २६ सप्टेंबरपर्यंत देशभरात मान्सूनने १०७ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही टक्केवारी सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक असून, परतीचा पाऊस सुरू होण्यास अद्यापही बहुतांश कालावधी शिल्लक आहे. परिणामी, १०७ टक्क्यांवर पोहोचलेला मान्सून सप्टेंबर महिना संपेपर्यंत ११० टक्क्यांपर्यंत विक्रमी मजल मारेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. या पावसाची नोंद जास्तीचा मान्सून म्हणून केली जाईल.१ जून ते २७ सप्टेंबर या कालावधीत देशभरात ९३१.५ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात मात्र या काळात सरासरी ८६९.४ मिलीमीटर पावसाची नोंद होते. देशात सरासरीच्या तुलनेत अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला असून, ही नोंद ७ टक्के अधिक आहे.राज्यांचा विचार करता राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, गोवा, कर्नाटक, सिक्कीम, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. हिमाचल, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांत सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हरयाणा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि मणिपूर या राज्यांत आतापर्यंत सर्वाधिक कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये अतिरिक्तपेक्षा अधिक पावसाची नोंदमहाराष्ट्राचा विचार करता सोलापूर, बीड, लातूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत सर्वांत कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे या जिल्ह्यांत अतिरिक्तपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, अहमदनगर, जळगाव, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत अतिरिक्त पाऊस नोंदविण्यात आला आहे.उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत आतापर्यंत सर्वसाधारण पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस