शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

पावसाळी अधिवेशन : ‘एमपीडीए’ कायद्यात महत्त्वाचा बदल; मानवी तस्करीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:01 IST

मानवी तस्करी आर्थिक फायद्यासाठी संघटित पध्दतीने केली जाते व सीमेपार या गुन्ह्याचे धागेदोरे व लागेबांधे असल्यामुळे या गुन्ह्याचा समावेश ‘मोक्का’ कायद्यात करावा, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.

ठळक मुद्दे मानवी तस्करी आर्थिक फायद्यासाठी संघटित पध्दतीने केली जामानवी तस्करीच्या गुन्ह्याचा समावेश करण्यात आला

नाशिक : देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या व महाराष्ट्रची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आंतरराष्टÑीय स्तरावरुन मानवी तस्करी केली जाते. देशात हा गुन्हा मेठ्या प्रमाणात फोफावत असला तरी महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा असलेला कायदा कमकुवत स्वरुपाचा असून त्यासाठी महाराष्ट्रत धोकादायक कृत्यांना प्रतिबंध असलेल्या कायद्यात (एमपीडीए) संशोधन विधेयक-३२ विधानसभेत पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आले यामध्ये मानवी तस्करीच्या गुन्ह्याचा समावेश करण्यात आला असून गुन्हेगारांना एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचा पोलिसांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.१३ डिसेंबर २०१७ रोजी बांग्लादेशी मुलीला नाशिकमधील सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील कुंटणखाण्यावर ‘नानी’कडे विक्री क रण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यानंतर पीडित मुलीचा सौदा ‘नानी’ने मुंबईच्या कुंटणखाण्यासाठी केला,काही महिने मुंबईला पिडित मुलगी राहिली व तेथून पुन्हा तीला कोलकात्याच्या ‘त्या’ बाजारात विकली गेली होती. कोलकातामधील एका ग्रामीण भागात देहव्यापार बळजबरीने करून घेतला जात असताना मुलीने जीव मुठीत धरून त्या नरकसमान बाजारातून बाहेर उडी घेत पलायन केले. नाशिकमध्ये आलेल्या या बांगलादेशी तरु णीने प्रसारमाध्यमांसमोर जिवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ‘बुरखा’ फाडला होता. ही घटना संपुर्ण राज्यात गाजली होती. यानंतर मागील हिवाळी अधिवेशनात आमदार देवयानी फरांदे यांनी एमपीडीए कायद्यात महत्त्वाचा बदल करत मानवी तस्करीचा त्यात समावेश करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची सरकारने दखल घेत या कायद्यात बदल करुन संशोधक विधेयक सहा महिन्यातच पावसाळी अधिवेशनात सादर केले. नव्या विधेयकामुळे मानवी तस्करी करणाºयांना यापुढे एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याची कारवाई पोलिसांकडून होऊ शकते.‘मोक्का’मध्ये समावेश करामानवी तस्करीप्रकरणी गुन्हेगारांना एक वर्षासाठी तडीपार जरी करण्यात आले तरी ते गुन्हेगार मोकाटपणे दुस-या शहरांमध्ये जाऊन पुन्हा तो गुन्हा घडवून आणतील, असे पावसाळी अधिवेशनात फरांदे यांनी सभागृहात सांगितले. मानवी तस्करी आर्थिक फायद्यासाठी संघटित पध्दतीने केली जाते व सीमेपार या गुन्ह्याचे धागेदोरे व लागेबांधे असल्यामुळे या गुन्ह्याचा समावेश ‘मोक्का’ कायद्यात करावा, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८NashikनाशिकDevyani Farandeदेवयानी फरांदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस