शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पावसाळी अधिवेशन : ‘एमपीडीए’ कायद्यात महत्त्वाचा बदल; मानवी तस्करीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:01 IST

मानवी तस्करी आर्थिक फायद्यासाठी संघटित पध्दतीने केली जाते व सीमेपार या गुन्ह्याचे धागेदोरे व लागेबांधे असल्यामुळे या गुन्ह्याचा समावेश ‘मोक्का’ कायद्यात करावा, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.

ठळक मुद्दे मानवी तस्करी आर्थिक फायद्यासाठी संघटित पध्दतीने केली जामानवी तस्करीच्या गुन्ह्याचा समावेश करण्यात आला

नाशिक : देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या व महाराष्ट्रची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आंतरराष्टÑीय स्तरावरुन मानवी तस्करी केली जाते. देशात हा गुन्हा मेठ्या प्रमाणात फोफावत असला तरी महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा असलेला कायदा कमकुवत स्वरुपाचा असून त्यासाठी महाराष्ट्रत धोकादायक कृत्यांना प्रतिबंध असलेल्या कायद्यात (एमपीडीए) संशोधन विधेयक-३२ विधानसभेत पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आले यामध्ये मानवी तस्करीच्या गुन्ह्याचा समावेश करण्यात आला असून गुन्हेगारांना एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचा पोलिसांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.१३ डिसेंबर २०१७ रोजी बांग्लादेशी मुलीला नाशिकमधील सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील कुंटणखाण्यावर ‘नानी’कडे विक्री क रण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यानंतर पीडित मुलीचा सौदा ‘नानी’ने मुंबईच्या कुंटणखाण्यासाठी केला,काही महिने मुंबईला पिडित मुलगी राहिली व तेथून पुन्हा तीला कोलकात्याच्या ‘त्या’ बाजारात विकली गेली होती. कोलकातामधील एका ग्रामीण भागात देहव्यापार बळजबरीने करून घेतला जात असताना मुलीने जीव मुठीत धरून त्या नरकसमान बाजारातून बाहेर उडी घेत पलायन केले. नाशिकमध्ये आलेल्या या बांगलादेशी तरु णीने प्रसारमाध्यमांसमोर जिवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ‘बुरखा’ फाडला होता. ही घटना संपुर्ण राज्यात गाजली होती. यानंतर मागील हिवाळी अधिवेशनात आमदार देवयानी फरांदे यांनी एमपीडीए कायद्यात महत्त्वाचा बदल करत मानवी तस्करीचा त्यात समावेश करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची सरकारने दखल घेत या कायद्यात बदल करुन संशोधक विधेयक सहा महिन्यातच पावसाळी अधिवेशनात सादर केले. नव्या विधेयकामुळे मानवी तस्करी करणाºयांना यापुढे एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याची कारवाई पोलिसांकडून होऊ शकते.‘मोक्का’मध्ये समावेश करामानवी तस्करीप्रकरणी गुन्हेगारांना एक वर्षासाठी तडीपार जरी करण्यात आले तरी ते गुन्हेगार मोकाटपणे दुस-या शहरांमध्ये जाऊन पुन्हा तो गुन्हा घडवून आणतील, असे पावसाळी अधिवेशनात फरांदे यांनी सभागृहात सांगितले. मानवी तस्करी आर्थिक फायद्यासाठी संघटित पध्दतीने केली जाते व सीमेपार या गुन्ह्याचे धागेदोरे व लागेबांधे असल्यामुळे या गुन्ह्याचा समावेश ‘मोक्का’ कायद्यात करावा, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८NashikनाशिकDevyani Farandeदेवयानी फरांदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस