शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

मान्सून मालदीव बेटावर, ४८ तासांत मान्सून दक्षिण केरळ, तामिळनाडू व बंगाल उपसागरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 05:08 IST

नैऋत्य मोसमी पावसाचे रविवारी अरबी समुद्राच्या कोमारीन भाग, मालदीव बेट, बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान, निकोबार बेट, अंदमान समुद्रात आगमन झाले आहे.

पुणे -  नैऋत्य मोसमी पावसाचे रविवारी अरबी समुद्राच्या कोमारीन भाग, मालदीव बेट, बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान, निकोबार बेट, अंदमान समुद्रात आगमन झाले आहे.४८ तासांत मान्सून दक्षिण केरळ, तामिळनाडु व बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल हवामान असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़२४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २९ मे ला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल़३० व ३१ मे रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यताआहे़प्रमुख शहरांमधील कमाल तापमान(अंश सेल्सिअस)पुणे ३९़६, लोहगाव ४०़५,जळगाव ४४़२, कोल्हापूर ३६़३, महाबळेश्वर ३१़७, मालेगाव ४४़२, नाशिक ४०़३, सांगली ३५़४, सातारा ३६़७, सोलापूर ४०़१, मुंबई ३४, अलिबाग ३३़९, रत्नागिरी ३४़२, पणजी ३२़५, डहाणू ३६़१, उस्मानाबाद ३९़५, औरंगाबाद ४१़४, परभणी ३४़३, अकोला ४५, अमरावती ४३़८, बुलडाणा ४१़५, ब्रम्हपुरी ४२़३, चंद्रपूर ४२़४, गोंदिया ४०़५, नागपूर ३८़८, वर्धा ४१़५, यवतमाळ ४२़पावसाळ््यातील पर्जन्याच्या दिवसांत घटच्पावसाळ््यातील चार महिन्यांच्या काळात होणाऱ्या पर्जन्याच्या दिवसांत घट होत आहे. सरासरीएवढा पाऊस पडत असला तरी पावसाचे दिवस कमी होत आहेत, असे १०० वर्षांतील पावसाचा अभ्यास केल्यानंतर निदर्शनास आले आहेत. विशेष म्हणजे या स्थितीचा शेतीवर परिणाम होऊ लागला आहे़च्पावसाळ््यातील चार महिन्यांत पाऊस विभागून व्हावा, अशी अपेक्षा असते़ परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये दोन अथवा तीन महिन्यांत होणारा पाऊस सरासरी गाठतो. कोरड्या दिवसांच्या संख्येत वाढ होत आहे़ जूनमध्ये लातूरला कमी पाऊस झाला आहे़ त्याचवेळी पुणे जिल्ह्यात त्याचे प्रमाण वाढले आहे़ सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच नाशिक जिल्ह्यातही जूनमध्ये पाऊस वाढला आहे़च्जुलै महिन्यात जालना, लातूर, वर्धा, भंडारा तेथील पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे़ उस्मानाबाद, चंद्रपूरलाही पाऊस कमी झाला आहे़ त्याचवेळी सातारा, कोल्हापूर, मुंबईत जुलै महिन्यातील पावसाचे प्रमाण वाढले आहे़च्आॅगस्टमध्ये संपूर्ण राज्यात चांगला पाऊस होत असल्याचे व त्यात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे़ सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, जळगाव, अमरावती, बुलडाणा, अकोला येथील पावसाच्या प्रमाणात ९९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे़ पुणे, रत्नागिरी, ठाणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांत पाऊस वाढला आहे़च्सप्टेंबरमध्ये गडचिरोली, यवतमाळ वर्धा, नांदेड, बीड, परभणी येथील पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे़ त्याचवेळी पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पावसात वाढ झाली आहे़ मान्सूनच्या चार महिन्यांतील पावसाचा विचार केल्यास भंडारा, उस्मानाबाद, लातूर तसेच वर्धा येथील पावसात घट झाली आहे़ त्याचेळी पुणे, नाशिक, रायगड जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण वाढले आहे़च्जूनमध्ये एका जिल्ह्यात, जुलैमध्ये ६ जिल्ह्यांत आणि सप्टेंबरमध्ये ६ जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते़ पाऊस पडण्याचा काळ आणि वेळ यात बदल झाला असून त्याचा परिणाम शेती आणि शेती उत्पादनावर झाला आहे़गेल्या काही वर्षांत चार महिन्यांत पडणारा पाऊस हा २ ते ३ महिन्यांतच पडू लागला आहे. कोरड्या दिवसांमध्ये वाढ झाली असल्याचे अभ्यासावरून दिसून येते.- डॉ़ पी़ गुहाठाकुर्ता, अभ्यासक

१९०१ ते २००६ मध्ये दर महिन्याला पडलेल्या पावसाचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील ३३५ पर्जन्य मापक केंद्रातील माहितीचा उपयोग करण्यात आला आहे.राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ ईशान्य भारतात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे़

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Rainपाऊसnewsबातम्या