शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; मराठवाडा, खान्देशात दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 06:38 IST

मुंबईत घामाच्या धारा; कोकण, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सरी

पुणे/औरंगाबाद/जळगाव : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, त्याने सुरतपर्यंत धडक मारल्याचे हवामान विभागाने रविवारी जाहीर केले़ दिवसभरात मराठवाड्यातील अनेक भागांत आणि खान्देशात जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तापी आणि पूर्णा नद्यांना पूर आला आहे. विदर्भात नागपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत पाऊस झाला. याशिवाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरसह अनेक ठिकाणी रिपरिप पाऊस झाला. मुंबईत हवामान ढगाळ असले तरी पाऊसच न झाल्याने मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या होत्या. जवळपास अर्ध्या मराठवाड्यात शनिवारी मध्यरात्री व रविवारी चांगला पाऊस झाला.नांदेड जिल्ह्यात किनवटमध्ये, हिंगोली जिल्ह्यात औंढा आणि शिरड शहापूर परिसरात, बीड जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई आणि आष्टीत दमदार पाऊस झाला. जालना शहर आणि परभणीतही पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील इस्लापूर मंडळात रविवारी अतिवृष्टीची नोंद झाली. येथे ८३ मि़मी़ पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सरासरी २० मि.मी. पाऊस झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूरजवळील पर्यायी पूल वाहून गेला. हे पाणी तुंबल्याने आजूबाजूच्या शेतात पाणी घुसले आणि पेरणीही खरडून गेली. वसमत वगळता इतर चारही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. औंढा मंडळात ६२, तर शिरड शहापूर मंडळात ७५ मि.मी. पाऊस झाला.मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यतासोमवारी आणि मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.मराठवाड्यात जोरदार हजेरीबीड जिल्ह्यात शनिवारी रात्री बीड, अंबाजोगाई आणि आष्टी तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली. अन्य तालुक्यांमध्ये सौम्य स्वरूपाचा पाऊस झाला. सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यात ८४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. जालना शहरासह जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. यात सर्वाधिक २८.२० मि.मी. पाऊस अंबडमध्ये झाला. घनसावंगी तालुक्यात २५.२९ मि.मी. पाऊस पडला.खान्देशात जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात दमदार सरी बरसल्या. जळगावमधील अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली. हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाचे १४ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडल्याने तापी व पूर्णा नद्यांना पूर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पहाटे जोरदार सरी बरसल्या.उपराजधानीत मान्सूनची जोरदार ‘एन्ट्री’चक्रीवादळाच्या वाटचालीची गती मंदावल्याने चकवा देणाऱ्या पावसाने अखेर उपराजधानी नागपुरातही रविवारी दमदार ‘एन्ट्री’ केली. आज पाऊस येणार नाही म्हणून ‘लॉकडाऊन’मध्येही बाहेर पडलेल्या नागरिकांना पावसाने रस्त्यात गाठले. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांची कसरत झाली.एक दिवस अगोदरच महाराष्ट्र व्यापलानैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेशचा काही भाग, छत्तीसगड, झारखंड व बिहारच्या बहुतांश भागांत झाली आहे़ मान्सूनने व्यापलेली रेषा सुरत, नंदुरबार, बैतूल, सिवनी, पेंड्रा रोड, अंबिकापूर, गया, पाटणा इथपर्यंत आहे़ निर्धारित नव्या तारखांच्या एक दिवस अगोदरच मान्सूनने महाराष्ट्र व्यापला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़ मात्र, मान्सूनच्या आगमनाला नेहमी जसा पाऊस अनुभवास येतो, तसा अनुभव अनेक ठिकाणी आलेला नाही़