शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

मोहाच्या दारूची अस्वलांनाही नशा

By admin | Updated: December 22, 2016 17:31 IST

ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्यात असलेल्या गावालगतच्या जंगलात मोहाच्या झाडांच्या फुलांपासून गावठी दारू बनविण्यात येते

विवेक चांदूरकर/ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 22 - ज्ञानगंगा व अंबाबरवा  अभयारण्यात असलेल्या गावालगतच्या जंगलात मोहाच्या झाडांच्या फुलांपासून गावठी दारू बनविण्यात येते. ही मोहाची फुले खाण्याकरिता अस्वल गावामध्ये येत असून, यातूनच हल्ले होत असल्याचीशक्यता बीअर एक्स्पर्ट समितीच्या संशोधकांनी वर्तविली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्य आहे. या दोन्ही अभयारण्यात अस्वलांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या अभयारण्यात अनेक गावेही आहेत.या गावातील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून अभयारण्यात शेती करीत आहेत. मात्र, गत काही महिन्यांमध्ये अस्वलांचे हल्ले वाढले असून, चार महिन्यात चार जणांचा मृत्यू झाला तर दहा ते बारा जण जखमी झाले. डोंगर खंडाळा व डोंगर शेवली या गावांमध्ये अस्वलाने हल्ले करून तिघांना ठार केले. यासोबतच मोताळा तालुक्यात शेतांमध्ये अस्वलाचा वावर वाढला होता. पिलासह असलेल्या या अस्वलामुळे शेतकरी भयभीत झाले होते. याच भागात शेतातील झाडावर पाय अडकलेल्या अस्वलाला वनविभागाने ताब्यात घेवून जंगलात सोडले. जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून अस्वल व शेतकरी वास्तव्य करीत आहेत. आतापर्यंत अस्वलांच्या हल्ल्यांच्या घटना घटना घडल्या नाहीत. मात्र, अचानकच अस्वलांचे हल्ले का वाढले, याचा शोध घेण्यासाठी अस्वलांवर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीला पाचारण करण्यात आले आहे. या समितीने अभयारण्याची व हल्ले झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. गावांमध्ये काही नागरिक मोहाच्या फुलांपासून दारू बनवितात. तसेच गावालगतच्या शेतांमध्ये, झुडूपांमध्ये दारू बनविण्यात येते. यामध्ये वापरण्यात येणारे मोह हे अस्वलाचे प्रमुख खाद्य आहे. अस्वलाला दूरवरून या मोहाच्या फुलांचा गंध येतो. त्यामुळे अस्वल या मोहाच्या फुलाकडे आकर्षित होते व त्या ठिकाणाकडे धाव घेते. सदर दारूच्या भट्या या गावालगत असल्यामुळे अस्वली गावाकडे वळल्या असल्याचे मत   बीअर एक्स्पर्ट कमिटी नवी दिल्लीचे सहसंचालक डॉ. निशीथ धारिया यांनी व्यक्त केले आहे. अस्वल हा मुळ आक्रमक प्रवृत्तीचा प्राणी असून, प्रजनानाच्या काळात किंवा पिल्लांसह असलेली मादी अस्वल अधिकच आक्रमक असते. त्यामुळे मोहाच्या गंधाने गावाच्या वेशीत आलेल्या अस्वलाला माणूस निदर्शनास पडल्यावर हल्ला करीत असल्याचीही शक्यता असल्याचे मत डॉ. धारिया यांनी व्यक्त केले आहे.वनविभागाने केली तक्रारीअभयारण्यात असलेल्या गावांमध्ये तसेच गावालगतच्या भागात अनेक ठिकाणी दारूच्या भट्या असून, या भट्यांकडे अस्वल आकर्षित होते व परिणामी हल्ले वाढत असल्याची तक्रार वनविभागाने पोलिस विभागाकडे केली आहे.गावातील काही नागरिक दारू बनविण्याकरिता मोहाच्या फुलांचा वापर करीत आहेत. ही फुले अस्वलाचे मुख्य खाद्य आहे. या फुलांच्या गंधाने अस्वल गावाकडे वळते. यादरम्यान माणूस व अस्वलाचा सामना झाला तर हल्ले होण्याचीशक्यता आहे.- डॉ. निशीथ धारिया सहसंचालक, बीअर एक्स्पर्ट कमिटी नवी दिल्ली.