शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विनाशाकडे घेऊन जाणारा मोदी पॅटर्न उखडून फेका- काँग्रेसची केंद्र सरकारवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 16:06 IST

नोटबंदी, जीएसटी, महागाई या तीन त्सुनामीच्या झळामुळे करोडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सर्व सामान्यांचे जगणे मुश्कील होण्यास मोदी सरकारचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत आहे.

नांदेड :  नोटबंदी, जीएसटी, महागाई या तीन त्सुनामीच्या झळामुळे करोडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सर्व सामान्यांचे जगणे मुश्कील होण्यास मोदी सरकारचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत आहे. हे दांभिक सरकार भारताला वेदपूर्वकाळात घेऊन जात आहे. आता अच्छे दिन येणार नाहीत, सरकार केवळ प्रतिमेचे खेळ करीत आहे. त्यामुळे उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या स्वप्नमयी दुनियेतून बाहेर पडत मोदी पॅटर्नला उखडून फेका, असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले.नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या ‘विचारातून विकासाकडे’ या कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन सोमवारी झाले.  कार्यक्रमाला माजी खा. भालचंद्र मुणगेकर, नियोजन समितीचे माजी सदस्य रत्नाकर महाजन, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. भाई जगताप, आ. अमिता चव्हाण, आ. डी. पी. सावंत, आ. वसंत चव्हाण, महापौर शैलजा स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण होते. रत्नाकर महाजन म्हणाले की, सध्या देश एका भयंकर यातनेतून जात आहे. चांगले दिवस येणार असे स्वप्न दाखवून केवळ मुठभरांसाठी काम करणा-या भाजपाने देशातील कष्टकरी, वंचित समाजाचे जगणे मुश्कील केले आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था खड्ड्यात जाणार हे जगभरातील तज्ज्ञ सांगत होते.  मात्र त्यानंतरही अट्टाहास करीत  देशाला अनेक वर्ष मागे लोटण्याचे पाप भाजपने केल्याचे ते म्हणाले. गोष्ट छोटी असते पण त्याचेच पुढे नखुरडे होते.  या देशाला विनाशापासून वाचविण्यासाठी आता भाजपाला रोखा, असे आवाहनही महाजन यांनी केले. भालचंद्र मुणगेकर म्हणाले, १७ वर्षापासून नांदेड मनपात काँग्रेस आहे. यावेळीही निर्विवाद सत्ता मिळणार त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या अ‍ॅडव्हान्स अभिनंदनासाठी आल्याचे सांगत त्यांनीही भाजपा सरकारच्या कारभारावर खरमरीत टीका केली. देशातील जनतेने तब्बल २७ वर्षानंतर पूर्ण बहुमताने एका पक्षाच्या हाती सत्ता दिली होती. खरे तर सरकारने या संधीचं सोन करायला हव होतं.  मात्र त्या ऐवजी देशाची वाटचाल विनाशाकडे सुरू झाली. जनता आज अच्छे दिन नकोत आम्हाला, आम्हाला आमचे पुर्वीचे दिवस परत करा, असे म्हणत आहे.  नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एकप्रकारे सरकारने  कायदेशीर व संघटीतपणे जनतेची केलेली लुट असल्याचे टिकाही मुणगेकर यांनी केली़ या नोटाबंदीमुळे देशातील ४१ लाख लोकांचा पोटापाण्याचा रोजगार गेल्याची माहितीही त्यांनी दिली़ जीएसटीची सुरुवात काँग्रेसनेच केली़ एक वस्तू एक भाव असे ते सूत्र आहे़ मात्र तेंव्हा विरोधात असलेल्या भाजपाने सलग सात वर्षे याला विरोध केला़  आणि सत्तेत आल्यानंतर मात्र कुठलेही नियोजन न करता जीएसटी लागू करीत या उपक्रमाचेही मातेरे केले़ कालपरवा यशवंत सिन्हांनी सरकारच्या या सर्व फसलेल्या आर्थिक नियोजनावर टिका केल्यानंतर त्यांच्याच मुलाला सिन्हा विरोधात लिहायला सांगितले़ सरकार सत्तेसाठी कुठल्या थराला जाते याचा प्रत्यय त्यांनी या घटनेद्वारे आणून दिला़ राज्यघटनेचा पाया असलेल्या मुलभूत कलमांना कुठल्याही सरकारला हात लावता येत नाही़ त्यामुळेच राज्यघटनेला हात न लावता वेगवेगळ्या माध्यमातून घटना प्रभावहीन करण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत़ राजस्थान सरकारने निवडणुकीत उभे राहण्यासाठी घातलेली शैक्षणिक पात्रतेची अट हे त्याचेच उदाहरण़ या अटीमुळे देशातील दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक, वंचित घटकाला  निवडणुकीपासून बाजूला फेकण्याचे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नांदेड मनपा निवडणुकीकेडे २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून पहा असा सल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला. या सरकारच्या कारभाराचा समाजातील एकाही घटकाला फायदा झाला नाही़ त्यामुळेच जनतेचा रोष वाढतो आहे. त्याचेच प्रतिबिंब सोशल मिडीयात उमटताना दिसत असून  २०१९ मध्ये भाजपचे सरकार नसेल याचे संकेत मिळत आहेत़ कालपर्यंत भाजपा आमची राजकीय विंग असल्याचे सांगणारा राष्ट्रीय स्वंयमसेवक संघाने काल दसरा पुजनावेळी भाजपाचा उच्चारही केला नसल्याचे ते म्हणाले़  प्रास्ताविक आ़ अमरनाथ राजूरकर यांनी तर शेवटी आभार उपमहापौर शफी अहेमद कुरेशी यांनी मानले.

राजकारणात वैचारिक मतभेदअसतात ते असलेच पाहिजेत. परंतु आज केवळ विरोधांकडे द्वेष, मत्सर, खुनशीपण दिसतोय़ स्वच्छता अभियान राबविताय चांगले आहे़ परंतू रस्त्यावरची घाण साफ करण्या अगोदर मनातील वैचारिक घाण काढून टाका अशी टिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली़ पंतप्रधान मोदीनी नांदेडमध्येच पहिली सभा घेतली होती़ त्यावेळी नांदेडकरांनी मला ८० हजाराच्या मताधिक्याने निवडून दिले. कारण नांदेडकरांसोबतचे माझे नाते विश्वासाचे आहे. या महानगरपालिका निवडणुकीत ते अधिक मजबूत करू, असे विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस