शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या ‘हवाहवाई’ शैलीचा फुगा फुटतोय

By admin | Updated: October 10, 2014 00:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्तमान शैली जास्त दिवस प्रभाव टाकू शकणार नाही. नागरिकांना ही ‘हवाहवाई’ शैली समजली आहे व तिचा फुगा फुटतो आहे. देश व महाराष्ट्राला काँग्रेसच योग्य दिशेकडे घेऊन जाऊ शकते.

अशोक गेहलोत, बाला बच्चन यांचे प्रतिपादन : राज्यात काँग्रेसचेच सरकार येणारनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्तमान शैली जास्त दिवस प्रभाव टाकू शकणार नाही. नागरिकांना ही ‘हवाहवाई’ शैली समजली आहे व तिचा फुगा फुटतो आहे. देश व महाराष्ट्राला काँग्रेसच योग्य दिशेकडे घेऊन जाऊ शकते. राज्यात काँग्रेसच परत सत्ता स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाला बच्चन यांनी व्यक्त केला. हे दोघेही नेते नागपूर दौऱ्यावर आले असताना ‘लोकमत’ प्रतिनिधीशी चर्चा करताना त्यांनी आपले विचार बोलून दाखविले.मोठमोठ्या गोष्टी करून मोदी यांनी स्वत:बद्दल वातावरणनिर्मिती केली होती. परंतु आता मोदी यांच्या शैलीचा फुगा फुटतो आहे. त्यांच्याबद्दल जनतेचे समर्थन कायम राहावे, असे एकही काम मोदी यांनी आतापर्यंत केलेले नाही. त्यामुळे जनतेला कळून चुकले आहे की, मोदी यांच्या शैलीमुळे देशाचा विकास होणार नाही. त्यांच्या शैलीवरून भारतीय जनता पक्षातच अंतर्गत कलहाची स्थिती आहे. वरिष्ठ नेत्यांचा तेथे अपमान होत आहे. हे सर्व जास्त दिवस चालणार नाही, असे प्रतिपादन गहलोत व बच्चन यांनी केले.लोकसभा निवडणुकांत अपयशाला कारणीभूत ठरलेल्या त्रुटींना येणाऱ्या दिवसांत काँग्रेस दूर करेल, असेदेखील ते म्हणाले.यावेळी गहलोत यांनी राजस्थानबद्दलदेखील चर्चा केली. तेथे काँग्रेसने सुरू केलेल्या सर्व योजनांचा भाजप सरकारने बट्ट्याबोळ केला आहे. आमच्या कार्यकाळात महिलांचा विकास, आरोग्य आणि निवास या क्षेत्रात चांगले काम झाले होते. परंतु विद्यमान सरकार या योजनांना ना बंद करीत आहे ना समोर चालवत आहे. हरित राजस्थानचे स्वप्न पूर्ण करण्यासदेखील भाजप सरकारला फारशी रुची नाही, असा आरोप त्यांनी केला. परंतु सर्व स्थिती नक्कीच बदलेल, असा विश्वास गहलोत यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)