शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

‘मोदी’ लाटेत २०१४ मध्ये तगले सात अपक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 02:12 IST

यंदा संख्या घटण्याची चिन्हे; मतदारांचे पक्षाच्या उमेदवारांना प्राधान्य असल्याची स्थिती

- धनंजय वाखारेनाशिक : एकेकाळी अपक्षांची मदत घेतली जाऊन सरकारे चालविली जायची. २00९च्या निवडणुकीत तब्बल २४ अपक्ष उमेदवार निवडून गेले होते. मात्र, २0१४च्या निवडणुकीत मोदी लाटेपुढे अपक्षांनाही लोटांगण घालावे लागले आणि अवघे ७ अपक्ष तग धरू शकले.२00९ च्या निवडणुकीत ७0 लाखांहूून अधिक मते घेणाऱ्या अपक्षांनी २0१४ च्या निवडणुकीत २४ लाख ९३ हजार मते मिळविली. गेल्या तीन निवडणुकांचा धांडोळा घेता, २00४ च्या निवडणुकीत १,0८३ उमेदवार अपक्ष म्हणून सामोरे गेले. त्यातील १९ उमेदवारांना विधानसभेत पाऊल ठेवता आले, तर १00२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. या निवडणुकीत अपक्षांनी ५८ लाख ७७ हजार ४५४ मते घेतली. त्यांच्या मतांची टक्केवारी १४.0५ टक्के इतकी होती. २00९च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ती १,८२0 इतकी झाली. त्यातील तब्बल २४ उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली, तर १७४७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यावेळी अपक्षांनी तब्बल ७0 लाख २३ हजार ८१७ मते घेतली. मतांची टक्केवारी होती १५.५0 टक्के, तर आता सत्ताधारी असलेल्या भाजपची टक्केवारी होती १४.0२ टक्के. २0१४ च्या निवडणुकीत मात्र मोदी लाटेत कॉँग्रेस-राष्टÑवादीसह मनसे आदी प्रमुख राजकीय पक्षांची दारुण अवस्था बनली असताना अपक्षांनाही ‘जोर का झटका’ लागला. या निवडणुकीत १६९९ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्यात अवघे ७ अपक्ष निवडून आले. २00९ च्या निवडणुकीत ७0 लाखांहून अधिक मते घेणाºया अपक्षांना २0१४च्या निवडणुकीत २४ लाख ९३ हजार १५२ मते मिळाली. मतांच्या टक्केवारीत मोठी घसरण होऊन ती ४.७१ टक्क्यांवर आली. मोदी लाटेत अपक्षही भुईसपाट झाले. जे तगले त्यातील काहींनी सत्तेसोबत राहण्यास पसंती दिली. आता राज्यभर होत असलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात युतीला कौल दिला जात असताना आणि त्यातही विरोधकांतून होणारी महागळती पाहता प्रमुख विरोधी पक्षांना सक्षम उमेदवार देताना घाम गाळावा लागताना दिसून येत आहे.अपक्षांचे महत्त्व झाले कमीशिवसेना-भाजप सरकारच्या काळात सात अपक्ष आमदार होते. त्यात अमळनेरमधून शिरीष चौधरी, बडनेरातून रवि राणा, अचलपूरचे बच्चू कडू, पाथरीचे मोहन फड, कल्याण पूर्वचे गणपत गायकवाड, भोसरीचे महेश लांडगे आणि अहमदपूरचे विनायकराव जाधव-पाटील यांचा समावेश होता. गेल्या तीन निवडणुकांवर दृष्टिक्षेप टाकला तर अचलपूरमधून सलग तीनवेळा अपक्ष म्हणून निवडून येण्याचा विक्रम प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी केलेला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी