शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

मोदींनी देशातील पर्यटन विकासाची सुरुवात औरंगाबादेतून करावी : जलील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 18:14 IST

कधीकाळी औरंगाबादहून उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा सुरू होती. या सेवेचा पर्यटक मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने किमान दोन एअरलाईन दिल्ली आणि मुंबईसाठी सुरू कराव्या, अशी मागणी जलील यांनी केली.

नवी दिल्ली - औरंगाबादचे ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थान पाहता औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेच्या पहिल्या आधिवेशनात औरंगाबादच्या पर्यटन आणि उद्योगवाढीसाठी आपण काम करणार असल्याचे स्पष्ट केले. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ येथील लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात, मात्र विमानसेवा ठप्प झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला असून त्यामुळेच येथील उद्योग क्षेत्र देखील डबघाईला आल्याचे जलील यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देशातील पर्यटन विकासाला औरंगाबादेतून सुरुवात करावी, अशी विनंती जलील यांनी केली.

अजिंठा आणि वेरुळ या पर्यटन स्थळांमुळे औरंगाबादला जागतिक वारसा लाभला असून जगभरातील पर्यटक येथे येतात. मात्र जेटएअरवेज ही विमानसेवा कंपनी बंद पडली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम औरंगाबादच्या पर्यटनावर झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. तर औरंगाबादमध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. एअरलाईन बंद पडल्यामुळे अनेक उद्योग बंद पडली असून अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे एक एअरलाईन सुरू करण्यासाठी आम्ही संबंधित मंत्रालयात गेलो होतो. परंतु, जेट एअरवेजचे सर्व पाटलट दुसऱ्या कंपन्यांमध्ये शिफ्ट झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अडचण पायलटची नसून विमानसेवा ठप्प झाल्यामुळे पर्यटन इंडस्ट्री ढासळली आहे. याचा परिणाम उद्योगांवर झाल्याचे जलील यांनी नमूद केले.

कधीकाळी औरंगाबादहून उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा सुरू होती. या सेवेचा पर्यटक मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने किमान दोन एअरलाईन दिल्ली आणि मुंबईसाठी सुरू कराव्या, अशी मागणी जलील यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात पर्यटनावर भर देणार असल्याचे म्हटले आहे, याची आठवण करून देताना त्याची सुरुवात औरंगाबादेतून करावी, असंही जलील यांनी म्हटलं आहे.