शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी देशातील पर्यटन विकासाची सुरुवात औरंगाबादेतून करावी : जलील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 18:14 IST

कधीकाळी औरंगाबादहून उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा सुरू होती. या सेवेचा पर्यटक मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने किमान दोन एअरलाईन दिल्ली आणि मुंबईसाठी सुरू कराव्या, अशी मागणी जलील यांनी केली.

नवी दिल्ली - औरंगाबादचे ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थान पाहता औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेच्या पहिल्या आधिवेशनात औरंगाबादच्या पर्यटन आणि उद्योगवाढीसाठी आपण काम करणार असल्याचे स्पष्ट केले. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ येथील लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात, मात्र विमानसेवा ठप्प झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला असून त्यामुळेच येथील उद्योग क्षेत्र देखील डबघाईला आल्याचे जलील यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देशातील पर्यटन विकासाला औरंगाबादेतून सुरुवात करावी, अशी विनंती जलील यांनी केली.

अजिंठा आणि वेरुळ या पर्यटन स्थळांमुळे औरंगाबादला जागतिक वारसा लाभला असून जगभरातील पर्यटक येथे येतात. मात्र जेटएअरवेज ही विमानसेवा कंपनी बंद पडली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम औरंगाबादच्या पर्यटनावर झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. तर औरंगाबादमध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. एअरलाईन बंद पडल्यामुळे अनेक उद्योग बंद पडली असून अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे एक एअरलाईन सुरू करण्यासाठी आम्ही संबंधित मंत्रालयात गेलो होतो. परंतु, जेट एअरवेजचे सर्व पाटलट दुसऱ्या कंपन्यांमध्ये शिफ्ट झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अडचण पायलटची नसून विमानसेवा ठप्प झाल्यामुळे पर्यटन इंडस्ट्री ढासळली आहे. याचा परिणाम उद्योगांवर झाल्याचे जलील यांनी नमूद केले.

कधीकाळी औरंगाबादहून उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा सुरू होती. या सेवेचा पर्यटक मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने किमान दोन एअरलाईन दिल्ली आणि मुंबईसाठी सुरू कराव्या, अशी मागणी जलील यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात पर्यटनावर भर देणार असल्याचे म्हटले आहे, याची आठवण करून देताना त्याची सुरुवात औरंगाबादेतून करावी, असंही जलील यांनी म्हटलं आहे.