शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

मोदी खोटं बोलण्यात वस्ताद!

By admin | Updated: October 12, 2014 01:16 IST

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला १०० दिवस झाले असताना ते एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु करु शकले नाहीत. महागाई, देशाच्या असुरक्षित सीमा, महिला अत्याचार, विदेशातील काळे धन

काँग्रेसच विकासाचे वाटेकरी : शोभा ओझा यांची टीकागणेश वासनिक - अमरावतीनरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला १०० दिवस झाले असताना ते एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु करु शकले नाहीत. महागाई, देशाच्या असुरक्षित सीमा, महिला अत्याचार, विदेशातील काळे धन आदी आश्वासने त्यांची फोल ठरली असून मोदी हे केवळ खोटं बोलण्यात वस्ताद आहेत, अशी टीका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्ष शोभा ओझा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.अमरावती येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शोभा ओझा या शनिवारी आल्या असता त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करीत भाजप, शिवसेना हे पक्ष एकाच माळेचे मणी असल्याची टीका केली. राज्यात आघाडी तुटण्याला राष्ट्रवादी कारणीभूत आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या संपर्कात होती. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते १४४ जागा आणि मुख्यमंत्रीपदाची अट घालून होते. परिणामी आघाडी तुटताच भाजपने शिवसेनेसोबतची युती संपुष्टात आणली, हे त्याचे द्योतक आहे. काँग्रेस कदापिही धर्मांधशक्तीसोबत हातमिळवणी करणार नाही, हे पक्षाचे धोरण आहे. राष्ट्रवादी राजकीय पक्ष नसून ‘खंबा नोचा’ असा पक्ष आहे. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत जनता महाराष्ट्र काँग्रेसच्या हातीच देणार, असा आशावाद ओझा यांनी व्यक्त केला.काँग्रेसला बलिदानाची पार्श्वभूमी आहे. शेतकरी, शेतमजूर, दलित, शोषित, पीडित, आदिवासी, बेरोजगार, महिला सक्षमीकरण अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर विकास केला आहे. विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावरच लढविली जात आहे.लोकसभा निवडणुकीत मोदींनी मोठमोठे आश्वासने देऊन जनतेला भुरळ पाडली. मात्र हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान आदी राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मोदींची जादू चालली नाही. जनता एकदा खोट्या आश्वासनांना बळी पडली; आता पडणार नाही. मोदींचे खरे रुप जनतेपुढे आले आहे. त्यांनी विदेशात काय सौदेबाजी केली, हे लवकरच पुढे येईल. अमेरिकेतील औषधी कंपन्यांवरील नियंत्रण मोदींनी हटविल्याने आठ हजार रुपयांच्या जीवनरक्षक औषधींसाठी आता लाखो रुपये मोजावे लागतील. मोदींचे शासन हे गरिबांचे नव्हे तर उद्योगपतींचे शासन असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुजरात मॉडेलची हवा गूल झाली असून गुजरातपेक्षा महाराष्ट्र कितीतरी पटीने विकासात पुढे असल्याचा दावा ओझा यांनी केला. भाजप हा दलालांचा पक्ष असून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल, यात दुमत नाही, असेही त्या म्हणाल्या.शेतमालाच्या आधारभूत किमतीत घसरण- कमल व्यवहारेदेशात मोदी शासन येताच शेतमालाच्या आधारभूत किमतीत कमालीची घसरण झाली. त्यामुळे कापूस, धान्य, सोयाबीन, संत्रा, कांदा या महत्त्वपूर्ण पिकांना मातीमोल भाव मिळत आहे, असे महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे म्हणाल्या. राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तम शासन चालविले आहे. कुशल प्रशासक म्हणून त्यांना जनतेनीच गौरविले आहे. गारपिटग्रस्त, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. राज्यात आघाडी तुटल्याने काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात आहे. राष्ट्रवादीपेक्षा अधिक प्रमाणात यश मिळून शासन काँग्रेसच स्थापन करणार, असे व्यवहारे म्हणाल्यात.