शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोदी खोटं बोलण्यात वस्ताद!

By admin | Updated: October 12, 2014 01:16 IST

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला १०० दिवस झाले असताना ते एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु करु शकले नाहीत. महागाई, देशाच्या असुरक्षित सीमा, महिला अत्याचार, विदेशातील काळे धन

काँग्रेसच विकासाचे वाटेकरी : शोभा ओझा यांची टीकागणेश वासनिक - अमरावतीनरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला १०० दिवस झाले असताना ते एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु करु शकले नाहीत. महागाई, देशाच्या असुरक्षित सीमा, महिला अत्याचार, विदेशातील काळे धन आदी आश्वासने त्यांची फोल ठरली असून मोदी हे केवळ खोटं बोलण्यात वस्ताद आहेत, अशी टीका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्ष शोभा ओझा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.अमरावती येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शोभा ओझा या शनिवारी आल्या असता त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करीत भाजप, शिवसेना हे पक्ष एकाच माळेचे मणी असल्याची टीका केली. राज्यात आघाडी तुटण्याला राष्ट्रवादी कारणीभूत आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या संपर्कात होती. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते १४४ जागा आणि मुख्यमंत्रीपदाची अट घालून होते. परिणामी आघाडी तुटताच भाजपने शिवसेनेसोबतची युती संपुष्टात आणली, हे त्याचे द्योतक आहे. काँग्रेस कदापिही धर्मांधशक्तीसोबत हातमिळवणी करणार नाही, हे पक्षाचे धोरण आहे. राष्ट्रवादी राजकीय पक्ष नसून ‘खंबा नोचा’ असा पक्ष आहे. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत जनता महाराष्ट्र काँग्रेसच्या हातीच देणार, असा आशावाद ओझा यांनी व्यक्त केला.काँग्रेसला बलिदानाची पार्श्वभूमी आहे. शेतकरी, शेतमजूर, दलित, शोषित, पीडित, आदिवासी, बेरोजगार, महिला सक्षमीकरण अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर विकास केला आहे. विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावरच लढविली जात आहे.लोकसभा निवडणुकीत मोदींनी मोठमोठे आश्वासने देऊन जनतेला भुरळ पाडली. मात्र हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान आदी राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मोदींची जादू चालली नाही. जनता एकदा खोट्या आश्वासनांना बळी पडली; आता पडणार नाही. मोदींचे खरे रुप जनतेपुढे आले आहे. त्यांनी विदेशात काय सौदेबाजी केली, हे लवकरच पुढे येईल. अमेरिकेतील औषधी कंपन्यांवरील नियंत्रण मोदींनी हटविल्याने आठ हजार रुपयांच्या जीवनरक्षक औषधींसाठी आता लाखो रुपये मोजावे लागतील. मोदींचे शासन हे गरिबांचे नव्हे तर उद्योगपतींचे शासन असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुजरात मॉडेलची हवा गूल झाली असून गुजरातपेक्षा महाराष्ट्र कितीतरी पटीने विकासात पुढे असल्याचा दावा ओझा यांनी केला. भाजप हा दलालांचा पक्ष असून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल, यात दुमत नाही, असेही त्या म्हणाल्या.शेतमालाच्या आधारभूत किमतीत घसरण- कमल व्यवहारेदेशात मोदी शासन येताच शेतमालाच्या आधारभूत किमतीत कमालीची घसरण झाली. त्यामुळे कापूस, धान्य, सोयाबीन, संत्रा, कांदा या महत्त्वपूर्ण पिकांना मातीमोल भाव मिळत आहे, असे महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे म्हणाल्या. राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तम शासन चालविले आहे. कुशल प्रशासक म्हणून त्यांना जनतेनीच गौरविले आहे. गारपिटग्रस्त, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. राज्यात आघाडी तुटल्याने काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात आहे. राष्ट्रवादीपेक्षा अधिक प्रमाणात यश मिळून शासन काँग्रेसच स्थापन करणार, असे व्यवहारे म्हणाल्यात.