शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला सर्वाधिक निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 05:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे सामान्य आणि गरिबांसाठी काम करणारे सरकार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकारने चार वर्षांत प्रचंड मोठे विकासकार्य केले असून...

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे सामान्य आणि गरिबांसाठी काम करणारे सरकार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकारने चार वर्षांत प्रचंड मोठे विकासकार्य केले असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला सर्वाधिक निधी मिळाल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार व प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मोदी सरकारची चार वर्षे ही संपूर्ण देशाच्या प्रगतीची वर्षे आहेत. सरकारने सामान्य माणसासाठी काम केले असून वेगवेगळ्या योजनांचा कोट्यवधी लोकांना लाभ झाला आहे. दरवर्षी आपले प्रगतिपुस्तक जनतेसमोर मांडणारे पारदर्शी सरकार देशात आहे. विरोधकही मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाहीत, असे सांगतानाच मोदी सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यात दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आठ हजार कोटींचा निधी दिला. इतका निधी यापूर्वी कधीच मिळाला नव्हता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचाही राज्यातील शेतकºयांना मोठा लाभ झाला. बीड, जालनासारख्या एका एका जिल्ह्याला यातून ८०० कोटी मिळाले. केंद्र सरकारने राज्यातील शेतकºयांसाठी शीतगृहे, अन्न प्रक्रिया प्रकल्पही मोठ्या प्रमाणावर मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यातील सिंचनाचे अर्धवट पडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचन सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने ३६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात आतापर्यंतचे महामार्गांचे सर्वाधिक काम सुरू झाले आहे, असेही ते म्हणाले.महाराष्ट्राला केंद्राकडून प्रचंड मोठे पाठबळ लाभले आहे. आर्थिक विकास, गरिबांचे कल्याण, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचावणे, भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी सरकार देणे अशा अनेक बाबतीत मोदी सरकारने प्रभावी कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.रेल्वेसाठी मोठा निधीत्यांनी सांगितले की, अनेक दशके रेंगाळलेले महाराष्ट्राचे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यास केंद्र सरकारने मदत केली आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि आताचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रचंड निधी मंजूर केला आहे. मुंबईची रेल्वे सेवा सुधारण्यासाठी एकाच अर्थसंकल्पात ४० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. अर्थसंकल्पात एकाच शहरासाठी इतका निधी देण्यात आला ही अभूतपूर्व घटना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी