शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आर्थिक आघाडीवर मोदी सरकार अपयशी- डॉ. भालचंद्र मुणगेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 06:37 IST

‘भारतासमोरील आर्थिक आव्हाने : स्वरूप आणि उपाय’ या विषयावर बोलताना मुणगेकर यांनी आपली मते मांडली.

इंदापूर : देशात गेल्या अकरा वर्षांत २ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आज आर्थिक प्रगतीचा दर २ टक्क्यांनी कमी झाला आहे. नोटाबंदीचा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला. जीएसटीमध्ये बदल करून हे बिल पाच टप्प्यांत केले आहे. आज डिझेल व पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देशात बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला असून स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत अपयशी अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली ठरले आहेत. त्यामुळे मोदी सरकार आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे,अशी सडेतोड टीका राज्यसभेचे माजी खासदार तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी गुरूवारी केली.कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्रांगणात कर्मयोगी व्याख्यानमालेत ‘भारतासमोरील आर्थिक आव्हाने : स्वरूप आणि उपाय’ या विषयावर बोलताना मुणगेकर यांनी आपली मते मांडली.माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख ‘युवाभान : राष्ट्रशक्ती’ या विषयावर बोलताना म्हणाले की , ‘पराक्रमाच्या वयात पराक्रम करावाच लागतो. निसर्गाने प्रत्येकाला काहीतरी सामर्थ्य दिले आहे ते स्व: आपल्याला शोधून आपल्याला घडावे लागेल. प्रत्येकाला जेवढ्या लवकर आपले स्व: समजेल तेवढी आपली प्रगती व भविष्य लवकर घडणार आहे. महाविद्यालयातील कोणत्या कट्ट्यांवर आपण जास्त रेंगाळतो, यावर आपले भविष्य घडते. तारुण्यामध्ये तीन गोष्टी जपायच्या असतात ते म्हणजे तेजस्विता, तपस्वीता आणि तत्परता होय. कठीण किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आपण बुद्धी समतोल ठेवून निर्णय घेतले पाहिजे व लाखांचा पोशिंदा होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, ‘भाऊंनी आयुष्यभर लोकांसाठी कार्य केले. समाज उभा करण्याचे काम भाऊंनी केले. राजकारणामध्ये एक नैतिक अधिष्ठान असावे लागते ते भाऊंच्या रूपाने आम्हाला पाहावयास मिळाले.संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, अ‍ॅड. कृष्णाजी यादव, तुकाराम जाधव, प्रा. बाळासाहेब खटके, भरत शहा, रमेश जाधव, मयूर पाटील, मंगेश पाटील, चित्तरंजन पाटील, दीपक जाधव, महेंद्र रेडके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महादेव वाळुंज आणि प्रा. बाळासाहेब पराडे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी आभार मानले.सहकार चळवळ कुणीही नष्ट करू शकणार नाही...सहकार चळवळीने राज्यात आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवल्याचा इतिहास आहे. पण सध्या सहकार चळवळ मोडीत काढण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालू आहे. परंतु, ही चळवळ कुणीही नष्ट करू शकणार नाही, असेही मुणगेकर यांनी सुनावले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटलीBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकर