शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

बारावी परीक्षेच्या केंद्रावर माेबाईल बंदी ; केंद्रचालकांनाही नेता येणार नाही माेबाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 13:49 IST

वॉटसआपवरून होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी यंदापासून केंद्रचालकांपासून शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आदी कोणासही परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाता येणार नाही

पुणे : वॉटसआपवरून होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी यंदापासून केंद्रचालकांपासून शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आदी कोणासही परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाता येणार नाही अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली. उद्यापासून (गुरुवार, २१ फेब्रुवारी) बारावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. 

बारावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना मोबाईल आणता येणार नाही. त्याचबरोबर शिक्षकांकडील मोबाईल केंद्र संचालकांकडे जमा करावे लागतील. एका दिव्यांग विद्यार्थिनीला वैद्यकीय कारणास्तव आयपॅडवर परीक्षा देण्याची सवलत देण्यात आली आहे. यंदा बारावीच्या परीक्षेत ९ भाषा विषयांसाठी कृतीपत्रिका देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मंडळाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले व छपाई केलेलेच वेळापत्रक ग्राह्य धरावे असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,औरंगाबाद,मुंबई,कोल्हापुर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या नऊ मंडळामार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत परीक्षा होणार आहे.या परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी नोंदणी झाली आहे.यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८ १५१ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. यामध्ये कला,वाणिज्य,विज्ञान व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम या सर्व विभागाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यात एकूण ९७७१ कनिष्ठ महाविद्यालयातून या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात २९५७ परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षी सर्व विभागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहेत. पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसा़यनशास्त्र , जीवशास्त्र, गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. 

टॅग्स :examपरीक्षाPuneपुणेMobileमोबाइल