शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

"हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार; कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 11:23 IST

मनसेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गडकरी आणि फडणवीस या दोघांच्या भाषणाची क्लिप टाकली आहे

मुंबई – दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे अनेकदा अपघात झाले. निष्पापांचे जीव गेलेत. परंतु खड्ड्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास सरकारला अपयश येत आहेत. संसदेत मंत्री नितीन गडकरी आणि राज्याच्या विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत दिलेल्या उत्तरामुळे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार अशी स्थिती या हायवेच्या कामात निर्माण झालीय का असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.

मनसेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गडकरी आणि फडणवीस या दोघांच्या भाषणाची क्लिप टाकली आहे. त्यावर मनसेनं म्हटलं की, अखेर मुंबई-गोवा हायवेसाठी राज्यकर्त्यांनीही हात टेकले. सर्व सत्ताधीश नेत्यांची उत्तरं ऐका..असे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार असतील तर कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची? हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर 'राज'कीय इच्छाशक्ती हवी असं त्यांनी सांगितले.

काय म्हणाले नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीस?

मुंबई-गोवा महामार्गावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्याकडे यावर भाष्य करण्यासारखं काही नाही. मला उत्तर देताना खेद वाटतो. देशात मुंबई-गोवा आणि सिंगरौली या महामार्गावर पुस्तक लिहिलं जाऊ शकते. दुर्दैवी आहे, माझ्याकडे याबाबत उत्तर नाही असं त्यांनी संसदेत म्हटलं. तर मुंबई-गोवा महामार्गाबाबत अनेक कायदेशीर, कंत्राटदारांच्या अडचणी येतायेत. स्वत: गडकरींनी इतका प्रयत्न करूनही ज्यांनी देशभरात रेकॉर्डब्रेक रस्ते बांधले, पण त्यांनाही मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामात अनेक अडचणी आल्या, यश आले नाही असं देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत खंत व्यक्त केली.

मुंबई-गोवा मार्गावर खड्ड्यांसोबत तळ्याची मोफत सोय

वडखळ ते कोलाडमध्ये गडब, आमटेम, कोलेटी, पळस, नागोठणे, वाकण, ऐनघर, सुकेळी खिंड, खांब, वरसगाव येथून पुढे इंदापूरपर्यंत रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून मार्ग काढताना लहान-मोठ्या वाहनांसह, अवजड वाहनांच्या चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चार ते सहा फूट रुंदीचे व सुमारे एक ते दीड फूट खोलीचे हे खड्डे आहेत. त्यात पावसाचे पाणी भरल्याने वाहने खड्ड्यात आदळून कित्येकदा त्यांचा तोल जाऊन अपघात होतो. रात्रीच्या वेळी तर वाहनचालकांची कसोटी लागते.

टॅग्स :MNSमनसेNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस