शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील कशेळी टोलनाक्यावर रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेने मुंडण करुन घातले श्राद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 17:44 IST

गणपती आगमना पूर्वी खड्डे भरा अन्यथा टोल बंद करण्याचा दिला इशारा...

नितिन पंडीत 

भिवंडी:भिवंडी ठाणे या रस्त्याची खड्ड्यां मुळे पूर्णतः दुरावस्था झाली असून कशेळी येथील टोल नाक्यावर टोल वसुली मात्र राजरोस सुरु असून या रस्त्यावर तात्काळ खड्डे दुरुस्ती करा अन्यथा टोल वसुली बंद करा या मागणी करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कशेळी टोल नाका येथे बुधवारी मुंडण करून श्राद्ध आंदोलन करण्यात आले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी ,मदन पाटील ,मनोज गुळवी, संतोष साळवी,शिवनाथ भगत,परेश चौधरी, शरद नागावकर,संजय पाटील,अशरफ खान मोतीवाले,भरत पाटील, कामिनी खंडागळे यांसह असंख्य मनसे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ठाणे भिवंडी हा रस्ता बीओटी तत्वावर बनवण्यात येऊन या ठिकाणी टोल वसुली सुरू असून रस्त्यावरच ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो रस्त्याचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे .अंजुर फाटा ते कशेळी या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अवघ्या सात किलोमीटर चे अंतर पार पाडण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तासाचा वेळ लागत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागत आहे . त्यामुळे अनेक वाहन चालकांना मानेचा ,कमरेचा ,पाठीच्या  आजाराला देखील समोरे जावे लागत आहे. तर अनेक अपघात घडून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे . या रस्त्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे असतील तर टोलवसुली का केली जाते असा सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करून या दुरावस्थेस टोल वसूल करणारी कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग हे कारणीभूत असून त्या विरोधात टोल नाका येथे मनसे कार्यकर्त्यानी ब्राम्हणांच्या मंत्रघोषात श्राद्ध आंदोलन करून दोन कार्यकर्त्यानी मुंडन केले. 

खारबाव कामण रस्त्यावरील दुरावस्थे बाबत मनसेने आंदोलन करून ही दुरुस्ती न झाल्याने टोल नाका फोडला तेव्हा दुरुस्ती सुरू झाली सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याबाबत तसे करणे अपेक्षित आहे का असा सवाल उपस्थित करीत कशेळी टोल नाका ते अंजुर फाटा रस्ता गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी करीत जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत टोल वसुली करू नये असा इशारा देखील या ठिकाणी मनसेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी श्रीमती शिंदे यांना निवेदन देताना दिला. तर या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असून ते काम गणपती पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन श्रीमती शिंदे यांनी दिले आहे. या प्रसंगी कोणतीही अनुचित घटना घडू नये या करीत नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी स्वतः पोलीस अधिकारी कर्मचारी  यांसह चोख असा पोलीस बंदोबस्त टोल नाक्यावर ठेवला होता. 

टॅग्स :BhiwandiभिवंडीMNSमनसे