शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Raj Thackeray : "चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत", राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 21:07 IST

MNS Raj Thackeray : राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून जोरदार निशाणा साधला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. कुंभमेळा, नद्यांचं प्रदूषण अशा विविध मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून जोरदार निशाणा साधला. "चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आता विकी कौशल मेल्यावर कळलं का?  व्हॉट्सएपवर इतिहास वाचता येत नाही. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोकं घालायला लागेल. कोणीही बोलायला लागलं आहे. विधानसभेतही बोलतात."

"औरंगजेबचा जन्म गुजरातमधला. इतिहासाशी संबंध नाही ते हे सर्व बोलत आहेत. त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. त्यांना ना संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी. त्यांना तुमची माथी भडकवायची आहेत. हिंद प्रांतात अतिशय कडवड आणि प्रभावी स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊसाहेब ... हे त्यांचं स्वप्न. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंद प्रांतावर केलेला संस्कार, एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. एक विचार आहे. तो विचार जन्माला येण्याआधी काय परिस्थिती होती? सर्व जातीचे लोक कोणा ना कोणाकडे होतेच ना कामाला? तो काळ होता, परिस्थिती तशी होती."

"शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहीत होते, नंतर निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता, त्यांनी का असे निर्णय घेतले? या सर्व लोकांना जातीतून का पाहत आहात? अफजलखानाचा वकील कुळकर्णी नावाचा ब्राम्हण होता. शिवाजी महाराजांचा वकीलही ब्राम्हणच होता. तेव्हा सगळी माणसं कोणा ना कोणाकडे कामाला होती.  इतिहासातील प्रत्येक गोष्ट कागदावर लिहिलेली नाही. त्यावेळी परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील तर आपल्याला काय माहीत. चारशे वर्षांच्या इतिहासावर आपण आज भांडतोय. कशा अंगाने इतिहास पाहायचा हे आपण बघणार आहोत की नाहीत?" असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. 

'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला, इथेच गाडला'; राज ठाकरे म्हणाले औरंजेबाच्या कबरीवर बोर्ड लिहा

औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर तो दिल्लीला गेला असता. मोठा राजा होता. पण त्याला शिवाजी नावाची भीती वाटत होती. त्यामुळे तो दोन अडीच जिल्ह्यांसाठी इथेच थांबला होता. जी कबर आहे ना, ती सजवलेली काढून टाका तिथे फक्त कबर दिसुद्या. तिथे  एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, हा आमचा इतिहास असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज