शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

मनसे नेते वसंत मोरेंनी अखेर मौन सोडलं,मुस्लीम समाजाचे मानले आभार; "साहेबांच्या आदेशानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 08:43 IST

राज ठाकरेंनी ४ मेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा असा आदेश दिला. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली.

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवण्याची आक्रमक भूमिका घेतली. राज यांच्या भूमिकेनंतर पक्षातील मुस्लीम पदाधिकारी दुखावले. अनेकांनी राजीनामे दिले. पुण्यात शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची उचलबांगडी करण्यात आली. वसंत मोरे यांच्या जागी साईनाथ बाबर यांना जबाबदारी देण्यात आली.

राज ठाकरेंनी ४ मेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा असा आदेश दिला. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली. अनेक कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या. या सर्व घडामोडीत पुण्यात मनसेचे वसंत मोरे कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित झाला.सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मोरेंनी अखेर मौन सोडलं आहे. वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली. आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यातही सहकार्य करू असं सांगितले. त्यामुळे माझ्या प्रभागातील सर्व मुस्लीम बांधवांचे आभार आहेत असं त्यांनी सांगितले.

त्यानंतर वसंत मोरे यांना शिवतीर्थावर बोलवण्यात आले. राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगत मी राज ठाकरेंसोबतच आहे. मी मनसे सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. राज यांच्या ठाण्यातील उत्तरसभेत वसंत मोरे यांनी भाषण केले. राज ठाकरेंच्या भोंगे हटावच्या आक्रमक भूमिकेमुळे वसंत मोरे यांची अडचण झाल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यातही मोरे दिसले नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. वसंत मोरे मनसे सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु मी राजमार्गावर असं सांगत वसंत मोरे पुन्हा औरंगाबाद येथील सभेत दिसले त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळालं.

मुंबईतील २६ मशिदींच्या मौलवींचा मोठा निर्णय, पहाटेची अजान भोंग्याविना होणार

राज्यातील मशिदींवरील भोंग्यांवरुन मनसेनं आंदोलन पुकारलेलं असताना मुंबईतील मौलवींनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांविना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बुधवारी रात्री उशिरा दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवी आणि धर्मगुरूंची बैठक झाली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत यापुढे पहाटेची अजान लाउडस्पीकर शिवाय केली जाईल असा ठराव संमत करण्यात आला. 'सुन्नी बडी मशिदी'मध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली होती. यात भायखळाच्या मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा येथील मुस्लीम धर्मगुरू सहभागी झाले होते.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे