शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

...तर जगात आपली नाचक्की झाली असती: मनसेचा सरकारवर हल्लाबोल, शिवकालीन पत्र वाचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 10:58 IST

मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्यावरून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. मनसेनेही त्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

छत्रपती संभाजीनगर - मालवणमध्ये जी दुर्देवी घटना घडली, ८ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे म्हणजे यात हलगर्जी निश्चित झाली आहे. अधिकारी आणि कंत्राटदार यांची भ्रष्ट युती त्यातून झालेला हा दुर्दैवी प्रकार आहे. शिवकालीन पत्राचा हवाला देत आज टोपीकर ही उपमा अधिकारी कंत्राटदारांना लागू होते. डोळ्यातून काजल जसं चोरून नेतात तसं भ्रष्टाचार करून आपला फायदा करून घेतात अशा शब्दात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, फार वर्षापूर्वी एका वृत्तपत्रात शिवकालीन पत्र छापलं होते ते माझ्या वाचण्यात आले. मी मालवणमधील घटनेपासून अस्वस्थ होतो. मी दुर्ग अभ्यासक प्रा. घाणेकर यांच्याशी संपर्क केला त्यांनीसुद्धा त्यांच्या पुस्तकात पत्राचा उल्लेख केला होता. माझे सांगलीचे मित्र प्रविण भोसले यांचाही शिवकालीन इतिहासावर अभ्यास आहे. प्रत्येक गोष्टीला ते पुरावे शोधतात. त्यांचे एक पुस्तक आहे सिंधुदुर्ग शिवलंका नावाचं, त्यात प्रकाशित झालेला हा उतारा आहे. पत्रातील भाषा आणि त्यावेळी महाराज किती जागरुक होते हे दिसून येते. अष्टावधानी आमचा राजा, दुर्दैवाने त्यांचाच पुतळा त्यांनी बांधलेल्या किल्ल्यासमोर पडावा, जो किल्ला ३५० वर्ष झाली समुद्राच्या प्रत्येक वातावरणाला तोंड देत आजही ताठमानेने उभा आहे त्याचे कारण म्हणजे आपण एखादं काम करताना निस्वार्थपणे केले पाहिजे, त्या कामाचं आपल्याला महत्त्व असले पाहिजे. लोक पैसा कमवण्याच्या दृष्टीतून या सर्व गोष्टी पाहतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

महाराजांनी लिहिलेल्या पत्रात काही वाक्ये खूप चांगली आहेत असं सांगत प्रकाश महाजनांनी ते पत्र वाचून दाखवले. त्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावलेले बरे जाणणे, पायात ओतण्यापायी शिसे धाडावयची व्यवस्था केली असे, नीट पाहूनी मोजूनी माल ताब्यात घेणे, टोपीकर सावकर लबाड जात, डोळ्यातील काजल चोरून नेतील पत्ता लागू देणार नाही. सिंधुदुर्ग समुद्र खारो पाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करून महाराज असं पुढे लिहितात, गोडे पाणी हाताशी बहुत पाण्याच्या टाक्या बांधूनी त्यात वाळू साठवणे, गोड्या पाण्यात चार दोनदा भिजू देणे, खारटान धुतले जाईल, चुनखडी पाठवित आहे, ती तपासून घेणे" इतकं बारीक लक्ष महाराजांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांची मालवण किल्ला बांधायला घेतला तेव्हा राजकारणाचा भाग म्हणून त्यांना आग्राला जावं लागतं, त्यानंतर पुढे त्यांची आग्र्यातून सुटका वैगेरे या कालखंडातही मालवण किल्ल्याचं काम सुरू होते. त्यांनी कसं काम करावं, काय नाही याची पूर्ण सूचना शिवाजी महाराजांनी तिथल्या लोकांना दिली होती असं मनसे नेते प्रकाश महाजनांनी म्हटलं. एबीपी माझाच्या मुलाखतीत त्यांनी हे पत्र वाचून दाखवलं.

दरम्यान, आज दुर्देवाने आम्ही कुठलाही प्रयत्न केला नाही की महाराजांचे स्मारक भव्य आणि टिकाऊ राहावे. ८ महिन्यात पुतळा पडतो. बरं झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रात पुतळा उभा केला नाही. आज जर तो पडला असता तर जगभर आपली नाचक्की झाली असती. आज जगात पाचवी सत्ता म्हणून मिरवत आहोत त्याचं हसं झालं असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण ज्या बाबतीत घ्यायला पाहिजे तो घेतला नाही म्हणून गेली १५ वर्ष मुंबई गोवा महामार्ग रखडला आहे. दर गणपतीला मुख्यमंत्री पाहणी करतात पण अजून झाले नाही असं सांगत प्रकाश महाजनांनी सत्ताधाऱ्यांच्या कामावर टीकास्त्र सोडलं.  

टॅग्स :MNSमनसेMahayutiमहायुतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज