शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

MPSC Exam Postponed: विद्यार्थ्यांनी उद्या आंदोलन केले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार; अमित ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 19:28 IST

MPSC Exam Postponed - यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली असून, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (amit thackeray) यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देmpsc परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचे राज्यभर पडसादराष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपने या निर्णयाविरोधात ठाकरे सरकारला घेरलेअमित ठाकरे यांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

मुंबई : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने राज्य सेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. (MPSC Exam Postponed) अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे. MPSC परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, पुण्यात हजारो विद्यार्थी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयाविरोधात ठाकरे सरकारला घेरले आहे. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली असून, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (amit thackeray) यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांनी उद्या आंदोलन केले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल अमित ठाकरे यांनी केला आहे. (mns leader amit thackeray slams maha vikas aghadi govt about mpsc exam postponed)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक १४ मार्च रोजी होणार होती. या परीक्षेला केवळ तीन दिवस उरलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे. एमपीएससी परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी या निर्णयामुळे संतप्त झाले आहेत. पुणे, संभाजीनगर तसेच राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा रोकडा सवाल अमित ठाकरे यांनी केला आहे. 

MPSC Exam Postponed: परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी

राजकीय वातावरण तापले

अधिवेशन आणि लग्न होतात मग MPSC परीक्षा का नाही, अशी विचारणा करत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एमपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी परीक्षेच्या मुद्द्यावर आपली भूमिका व्यक्त केली आहे. तसेच MPSC ची परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यांसह चंद्रकांत पाटील, विजय वड्डेटीवार, नितेश राणे यांसह अनेक नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे. 

परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा

एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वय निघून जाते, संधी हुकतात, या परीक्षा घेतल्याच पाहिजेत. सरकारचा निर्णय चुकीचा आहे, आता ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा आताच व्हायला हव्यात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुण्यात सुरू झालेला विद्यार्थ्यांच्या विरोधाचे पडसाद राज्यभर उमटल्याचे पाहायला मिळत असून, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, सांगली, यवतमाळ, हिंगोली, अकोला, वाशिम यांसारख्या अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण