शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

Gajanan Kale : "पक्षप्रमुखांनी हिंदुत्व गुंडाळून राष्ट्रवादीची तळी उचलल्याने पक्ष संपलाय"; मनसेची शिवसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:18 IST

MNS Gajanan Kale Slams Shivsena Ambadas Danve : मनसेचे नेते गजानन काळे यांनी अंबादास दानवेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उत्तर देताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Shivsena Ambadas Danve) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "पक्षप्रमुखांनी हिंदुत्व गुंडाळून ठेवून राष्ट्रवादीची तळी उचलल्यामुळे त्यांचा पक्ष संपलाय" असं म्हणत मनसेने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. तसेच ओवेसीच्या नगरसेवकांच्या जीवावर विधान परिषदेत आमदार होऊन नंतर लॉटरीमध्ये विरोधीपक्ष नेतेपद मिळालेले शिल्लक सेनेचे अंबा(दास) दानवे असं म्हणत त्यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे. 

मनसेचे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी अंबादास दानवेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "औरंगजेबाची औलाद ओवेसीच्या नगरसेवकांच्या जीवावर विधानपरिषदेत आमदार होऊन नंतर लॉटरीमध्ये विरोधीपक्ष नेतेपद मिळालेले शिल्लक सेनेचे अंबा(दास) दानवेंना त्यांच्या पक्षप्रमुखांनी हिंदुत्व गुंडाळून ठेवून राष्ट्रवादीची तळी उचलल्यामुळे त्यांचा पक्ष संपलाय याचा विसर पडलाय" असं गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच बारामतीचा पोपट हा हॅशटॅग देखील वापरला आहे. 

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कुणाचा यावरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात कोर्टकचेरीपासून रस्त्यावरही संघर्ष सुरू आहे. दरम्यान, आता राज ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावरून उद्धव ठाकरे यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. वारसा हा वास्तूचा नाही तर विचारांचा असतो, मला बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

"माझ्याकडे निशाणी, नाव असलं काय - नसलं काय; मला बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचाय!"

राज ठाकरे म्हणाले की, आज महापुरुषांचा वापर हा केवळ राजकारणासाठी केला जात आहे. वारसा हा वास्तूचा नसतो तर वासरा हा विचारांचा असतो. कोण कुठल्या वास्तूमध्ये आहे यावरून काही होत नसतं. विचारांचा वारसा पुढे चालवावा लागतो. आमच्या शिवछत्रपतींनी जो विचार दिला त्या विचारांची पताका पेशव्यांनी अटक किल्ल्यापर्यंत फडकवली. महाराजांचा विचार पोहोचवला कुणी तर पेशव्यांनी. पेशव्यांच्या हातात संपूर्ण सत्ता होती. मात्र त्यांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणवून घेतले नाही. छत्रपती तेच आम्ही त्यांचे नोकर, असे पेशवे सांगत. माझ्या आजोबांचा, माननीय बाळासाहेबांचा विचार मला पुढे न्यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेAmbadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना