शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील अतिक्रमण हटवण्याची मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 22:25 IST

एलफिस्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटने नंतर मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानक व परिसरातील प्रवाशांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर बसलेले फेरीवाले, बेकायदा पार्किंग व अतिक्रमण हटवण्याची मागणी मनसेने रेल्वे सुरक्षा बलासह स्टेशन मास्तरांकडे केली आहे.

मीरारोड - एलफिस्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानक व परिसरातील प्रवाशांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर बसलेले फेरीवाले, बेकायदा पार्किंग व अतिक्रमण हटवण्याची मागणी मनसेने रेल्वे सुरक्षा बलासह स्टेशन मास्तरांकडे केली आहे.मीरारोड व भार्इंदर ही शहरात दोन रेल्वे स्थानकं आहे. झपाट्याने शहर वाढल्याने या दोन्ही रेल्वे स्थानकांमधून प्रचास करणार-या प्रवाशांची संख्यादेखील काही लाखांच्या घरात आहे. भार्इंदर रेल्वे स्थानकात पश्चिम व पूर्वेला बाहेर पडणा-या जीन्यांजवळ बेकायदा रिक्षा, दुचाकी उभ्या असतात. तर काही प्रमाणात फेरीवालेदेखील अतिक्रमण करुन आहेत. यामुळे जीन्यावरुन बाहेर पडताना प्रवाशांना अडथळा होतो. दक्षिणेकडच्या अरुंद पुलावर तर फेरीवाले, भिकारी बस्तान मांडून असतात.मीरारोड स्थानक व पादाचारी पुलासह लागून असेला स्कायवॉक हा तर सर्रास फेरीवाल्यांनीच बळकावून टाकला आहे. या स्थानकाबाहेर देखील हातगाडी वाल्यांचा विळखा पडलेला आहे. स्काय वॉकखाली पालिकेने बेकायदेशीर रीत्या काही व्यावसायीकांना पक्के गाळे बांधुन दिले आहेत. मीरारोडच्या प्रवाशांना तर स्थानकात जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते. त्यातच बेकायदा पर्किंगची भर पडते.रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे प्रशासन, पोलीस व महापालिका हे फेरीवाले, भिकारी, गर्दुल्ले यांच्यावर कारवाई करण्यावरुन एकमेकांकडे बोटं दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रकार करतात. स्थानकाचे जीने वा मार्गा बाहेर होणारी बेकायदा पार्किंग, रिक्षांना हटवण्याकडे देखील दुर्लक्ष केले जाते. मीरारोड स्थानकालगत झालेले व्यावसायिक गाळ्यांवर कारवाई केली नात नाही आदी मुद्दे मनसेच्या शिष्टमंडळाने स्टेशन मास्तर व रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यांना निदर्शनास आणून दिले आहेत. त्यांना निवेदनसुद्धा दिले आहे. मनसे शहरअध्यक्ष प्रसाद सुर्वेसह शशी मेंडन आदी उपस्थित होते.रेल्वे, महापालिका, पोलीस आदी सर्व सबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही सुरू करुन रेल्वे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी असलेले सर्व जीने, मार्ग व प्रवेशद्वार मोकळे करावे, अशी मागणी प्रसाद सुर्वे यांनी केली आहे.