शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील अतिक्रमण हटवण्याची मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 22:25 IST

एलफिस्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटने नंतर मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानक व परिसरातील प्रवाशांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर बसलेले फेरीवाले, बेकायदा पार्किंग व अतिक्रमण हटवण्याची मागणी मनसेने रेल्वे सुरक्षा बलासह स्टेशन मास्तरांकडे केली आहे.

मीरारोड - एलफिस्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानक व परिसरातील प्रवाशांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर बसलेले फेरीवाले, बेकायदा पार्किंग व अतिक्रमण हटवण्याची मागणी मनसेने रेल्वे सुरक्षा बलासह स्टेशन मास्तरांकडे केली आहे.मीरारोड व भार्इंदर ही शहरात दोन रेल्वे स्थानकं आहे. झपाट्याने शहर वाढल्याने या दोन्ही रेल्वे स्थानकांमधून प्रचास करणार-या प्रवाशांची संख्यादेखील काही लाखांच्या घरात आहे. भार्इंदर रेल्वे स्थानकात पश्चिम व पूर्वेला बाहेर पडणा-या जीन्यांजवळ बेकायदा रिक्षा, दुचाकी उभ्या असतात. तर काही प्रमाणात फेरीवालेदेखील अतिक्रमण करुन आहेत. यामुळे जीन्यावरुन बाहेर पडताना प्रवाशांना अडथळा होतो. दक्षिणेकडच्या अरुंद पुलावर तर फेरीवाले, भिकारी बस्तान मांडून असतात.मीरारोड स्थानक व पादाचारी पुलासह लागून असेला स्कायवॉक हा तर सर्रास फेरीवाल्यांनीच बळकावून टाकला आहे. या स्थानकाबाहेर देखील हातगाडी वाल्यांचा विळखा पडलेला आहे. स्काय वॉकखाली पालिकेने बेकायदेशीर रीत्या काही व्यावसायीकांना पक्के गाळे बांधुन दिले आहेत. मीरारोडच्या प्रवाशांना तर स्थानकात जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते. त्यातच बेकायदा पर्किंगची भर पडते.रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे प्रशासन, पोलीस व महापालिका हे फेरीवाले, भिकारी, गर्दुल्ले यांच्यावर कारवाई करण्यावरुन एकमेकांकडे बोटं दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रकार करतात. स्थानकाचे जीने वा मार्गा बाहेर होणारी बेकायदा पार्किंग, रिक्षांना हटवण्याकडे देखील दुर्लक्ष केले जाते. मीरारोड स्थानकालगत झालेले व्यावसायिक गाळ्यांवर कारवाई केली नात नाही आदी मुद्दे मनसेच्या शिष्टमंडळाने स्टेशन मास्तर व रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यांना निदर्शनास आणून दिले आहेत. त्यांना निवेदनसुद्धा दिले आहे. मनसे शहरअध्यक्ष प्रसाद सुर्वेसह शशी मेंडन आदी उपस्थित होते.रेल्वे, महापालिका, पोलीस आदी सर्व सबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही सुरू करुन रेल्वे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी असलेले सर्व जीने, मार्ग व प्रवेशद्वार मोकळे करावे, अशी मागणी प्रसाद सुर्वे यांनी केली आहे.