शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील अतिक्रमण हटवण्याची मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 22:25 IST

एलफिस्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटने नंतर मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानक व परिसरातील प्रवाशांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर बसलेले फेरीवाले, बेकायदा पार्किंग व अतिक्रमण हटवण्याची मागणी मनसेने रेल्वे सुरक्षा बलासह स्टेशन मास्तरांकडे केली आहे.

मीरारोड - एलफिस्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानक व परिसरातील प्रवाशांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर बसलेले फेरीवाले, बेकायदा पार्किंग व अतिक्रमण हटवण्याची मागणी मनसेने रेल्वे सुरक्षा बलासह स्टेशन मास्तरांकडे केली आहे.मीरारोड व भार्इंदर ही शहरात दोन रेल्वे स्थानकं आहे. झपाट्याने शहर वाढल्याने या दोन्ही रेल्वे स्थानकांमधून प्रचास करणार-या प्रवाशांची संख्यादेखील काही लाखांच्या घरात आहे. भार्इंदर रेल्वे स्थानकात पश्चिम व पूर्वेला बाहेर पडणा-या जीन्यांजवळ बेकायदा रिक्षा, दुचाकी उभ्या असतात. तर काही प्रमाणात फेरीवालेदेखील अतिक्रमण करुन आहेत. यामुळे जीन्यावरुन बाहेर पडताना प्रवाशांना अडथळा होतो. दक्षिणेकडच्या अरुंद पुलावर तर फेरीवाले, भिकारी बस्तान मांडून असतात.मीरारोड स्थानक व पादाचारी पुलासह लागून असेला स्कायवॉक हा तर सर्रास फेरीवाल्यांनीच बळकावून टाकला आहे. या स्थानकाबाहेर देखील हातगाडी वाल्यांचा विळखा पडलेला आहे. स्काय वॉकखाली पालिकेने बेकायदेशीर रीत्या काही व्यावसायीकांना पक्के गाळे बांधुन दिले आहेत. मीरारोडच्या प्रवाशांना तर स्थानकात जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते. त्यातच बेकायदा पर्किंगची भर पडते.रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे प्रशासन, पोलीस व महापालिका हे फेरीवाले, भिकारी, गर्दुल्ले यांच्यावर कारवाई करण्यावरुन एकमेकांकडे बोटं दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रकार करतात. स्थानकाचे जीने वा मार्गा बाहेर होणारी बेकायदा पार्किंग, रिक्षांना हटवण्याकडे देखील दुर्लक्ष केले जाते. मीरारोड स्थानकालगत झालेले व्यावसायिक गाळ्यांवर कारवाई केली नात नाही आदी मुद्दे मनसेच्या शिष्टमंडळाने स्टेशन मास्तर व रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यांना निदर्शनास आणून दिले आहेत. त्यांना निवेदनसुद्धा दिले आहे. मनसे शहरअध्यक्ष प्रसाद सुर्वेसह शशी मेंडन आदी उपस्थित होते.रेल्वे, महापालिका, पोलीस आदी सर्व सबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही सुरू करुन रेल्वे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी असलेले सर्व जीने, मार्ग व प्रवेशद्वार मोकळे करावे, अशी मागणी प्रसाद सुर्वे यांनी केली आहे.