शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

'एकनाथ शिंदेंजी, तारीख, वेळ आणि किती बुलडोजर आणायचे सांगा'; भाजप आमदाराचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 21:25 IST

भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात एक विधान केले. 

कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीने जोर धरला आहे. एकेरी उल्लेख टाळून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा बदल करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी कोल्हापूर ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला आहे. याची सुरूवात कोल्हापुरातून झाली असून, यावेळी बोलताना भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आमदार टी. राजा सिंह कोल्हापुरात बोलताना म्हणाले, "काल एकनाथ शिंदेंनी एक खूप चांगले विधान केले. ते म्हणाले, 'आम्ही तोडू औरंगजेबाची कबर.' तर एकनाथ शिंदेंनी मी विचारू इच्छितो की, शिंदेजी, तारीख सांगा, वेळ सांगा आणि हेही सांगा की आम्ही लोकांनी किती बुलडोजर सोबत आणायचे?"

"किती लाख कार्यकर्ते पाहिजे तेही सांगा. जी वेळ सांगाल, त्यावेळेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे लाखो मावळे, त्या जागी पोहोचतील. पण, आता बोलणं बंद झालं पाहिजे. आता बास्स झालं. आता औरंगजेबाची कबर काढली पाहिजे. औरंगजेबाचे नाव आणि निशाण महाराष्ट्रातूनच नाही, तर संपूर्ण भारतातून नष्ट झाले पाहिजेत", अशी मागणी त्यांनी केली.  

मुख्यमंत्र्यांनी मोदींना पत्र लिहावं - टी. राजा सिंह  

"मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तातडीने एक पत्र पंतप्रधान मोदींना लिहा. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत त्याची कबर आहे. लाखो रुपये... आपल्या सगळ्यांच्या आयकरातून गेलेला पैसा त्या औरंगजेबाच्या कबरीच्या देखरेखीसाठी वापरला जात आहे", असे टी राजा म्हणाले.

शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलला -टी. राजा सिंह

आमदार टी. राजा सिंह यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्याच्या मागणीवर जोर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, हा मोर्चा मुंबईमध्ये येण्यापूर्वी त्यांनी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र