शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

उल्हासनगरातील अवैध बांधकामाचा आमदार आयलानी यांनी घेतला आढावा, कारवाई कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 16:17 IST

शहरातील अवैध बांधकामे, धोकादायक इमारती, दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था, २४ तास तैनात असलेली आपत्तकालीन टीम आदींचा आढावा आमदार कुमार आयलानी यांनी घेतला.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील अवैध बांधकामे, धोकादायक इमारती, दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था, २४ तास तैनात असलेली आपत्तकालीन टीम आदींचा आढावा आमदार कुमार आयलानी यांनी घेतला. यावेळी उपायुक्त प्रियंका राजपूत, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह प्रभाग अधिकारी, शाखा अभियंता उपस्थित होते.

उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र शहरात सुरू असून गेल्या दोन महिन्यापूर्वी अश्या घटनेत १२ जणांचा बळी जाऊन असंख्य जण जखमी झाले. तर शेकडो जण बेघर झाले. दुर्घटनाग्रस्त इमारती मधील बेघर झालेल्या शेकडो नागरिकांना पर्यायी उपाययोजना, दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीच्या पुनर्बांधणी साठीचा आराखडा, भविष्यात अवैध बांधकामे दुर्घटनाग्रस्त होऊन जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून महापालिकेने अवैध बांधकामावर केलेली कारवाई, आपत्कालीन टीम २४ तास तैनात ठेवणे. आदींचा आढावा घेण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यलयात मंगळवारी दुपारी आढावा बैठक घेऊन अधिकाऱयांचे म्हणणे ऐकून सूचना केल्या. यावेळी उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी महापालिका उपाययोजना व कारवाईची माहिती दिली. अवैध बांधकाम नियंत्रक व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी शहरातील अवैध बांधकामे व कारवाईची माहिती दिली.

 शहरात लॉकडाऊन काळात शेकडो अवैध बांधकामे उभी राहिली असून आजमितीस असंख्य आरसीसी, टिगेटरचे अवैध बांधकामे सुरू आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अवैध बांधकामावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेले प्रभाग अधिकारी अजित गोवारी, अनिल खतूराणी, अजय एडके यांच्यासह संबंधित उपयुक्तांच्या बदलीची मागणी शहरातून होत आहे. आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदलीवेळी त्यांना अवैध बांधकामाला जबाबदार धरले होते. मात्र काही दिवसातच बदली केलेल्या अधिकाऱ्यावर पुन्हा प्रभाग अधिकारी पदी नियुक्त केल्याने, शहरातून आयुक्तवर टीका झाली. तसेच अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याची मागणी होत आहे. 

अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर

आमदार कुमार आयलानी यांच्या आढावा बैठकीनंतर अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला असून कल्याण महापालिकेच्या धर्तीवर अवैध बांधकामाची यादी महापालिकेने जाहीर करावी. तसेच त्यांचा पाणी व वीज पुरवठा खंडित करावा. अशी मागणी शहरातून होत असून अवैध बांधकामाला जबाबदार असणाऱ्या संबंधित प्रभाग अधिकाऱ्याची उचलबांगडी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर