शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अबू आझमींकडून औरंगजेबाचं समर्थन; "औरंगजेब रहमतुल्लाह अलैह, मी इतिहास वाचलाय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 15:46 IST

आता या गोष्टी आणून त्यातून राजकीय फायदा घेण्याचं काम सुरू आहे असा आरोप आमदार अबू आझमींनी भाजपावर केला. 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचा जितका आदर इतर समाज करतो त्याहून अधिक मुस्लीम समाज करतो. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात मुस्लिमांसाठी खूप काही केले. ४० टक्के मुस्लीम त्यांच्याजवळ होते. वकील, सुरक्षा रक्षक सर्व मुस्लीम होते. ही लढाई धर्माची नव्हती तर सत्तेची होती. राजा, महाराजांना धर्माशी देणेघेणे नव्हतं असं आमदार अबू आझमींनी म्हटलं आहे. 

त्याचसोबत औरंगजेबाचं समर्थन करताना आझमी म्हणाले की, मी औरंगजेबाला रहमतुल्लाह अलैह म्हणतो. औरंगजेबाचा इतिहास मी वाचलाय, औरंगजेबाच्या फौजेत शिपाई हिंदू होता. औरंगजेबबाबत बनारसचा किस्सा यूट्यूबवर टाकला तर तुम्हाला दिसेल. एका पंडिताच्या मुलीवर औरंगजेबाच्या फौजेतील शिपाई वाईट नजर ठेवायचा जेव्हा या मुलीची तक्रार औरंगजेबाला प्राप्त झाली तेव्हा त्याने शिपायाचे दोन्ही हात हत्तीच्या पायाला बांधून फाडून टाकले. ही मुलगी हिंदू आहे तिचं रक्षण करणे माझे कर्तव्य आहे असं औरंगजेबाने म्हटलं असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत ज्या चबुतऱ्यावर औरंगजेबाने नमाज पठण केले त्याठिकाणी हिंदू बांधवांनी मशिद बांधली. आजही बनारसमध्ये ती मशिद आहे. औरंगजेबाने लिहिलेली चिठ्ठी आजही बनारस विद्यापीठात आहे. एका मंदिराला फंड द्या, त्याला नुकसान पोहचवू नका असं औरंगजेबाने सांगितले होते. आसाममध्ये मंदिरांसाठी औरंगजेबाने फंड दिला. औरंगजेबाने काय केले काय नाही केले हे १९४७ मध्ये सर्व गोष्टी संपल्या. आता या गोष्टी आणून त्यातून राजकीय फायदा घेण्याचं काम सुरू आहे असा आरोप आमदार अबू आझमींनीभाजपावर केला. 

दरम्यान, टिपू सुलतानने इंग्रजांविरोधात लढाई लढली. हे इतिहासात सर्वकाही उपलब्ध आहे. काहीजण टिपू सुलतानला विरोध करतात. शिवीगाळ करतात त्याला मी विरोध केला म्हणून मला जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येतात. मारायचे असेल मारून टाका. मृत्यू वरच्याच्या हातात आहे ज्याने तुम्हाला जन्म दिला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना सुरक्षा असूनही हत्या झाली. माझी सिक्युरिटी कुठेय? मी सामान्य माणूस पण माझे तोंड बंद होणार नाही. मी सत्य बोलत राहीन. मी या देशात हिंदू-मुस्लीम एकत्र करतोय पण सरकार हिंदू-मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करून सत्तेत यायला बघतेय असंही आझमी म्हणाले. 

जे व्हायचे ते होईलमला याआधीही धमक्या आल्यात. २ जणांना अटक केली होती. अद्याप कुणी मला हात लावला नाही. पोलीस तपास सुरू आहे. सरकारने माझी सुरक्षा कमी केलीय. जे काही व्हायचे ते होईल. सरकारची मर्जी असेल तसे त्यांनी करावे. मी सरकारवर आरोप लावत नाही. जे लोक टेलिव्हिजनवरून हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करतात मी त्यांच्याविरोधात आहेत. हा देश संविधानावर चालतो अशी प्रतिक्रिया अबू आझमींनी व्यक्त केली.  

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीBJPभाजपा