शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

कोरोनाचे कारण देत मिसाबंदींचे मानधन बंद शासनाकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 06:12 IST

राज्य सरकारचा निर्णय; लाभार्र्थींमध्ये संघाच्या स्वयंसेवकांची संख्या अधिक

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९७५ च्या आणिबाणीत तुरुंगवास पत्काराव्या लागलेल्या मिसाबंदीचे मानधन राज्याची आर्थिक स्थिती कोरोनामुळे चांगली नसल्याचे कारण देत राज्य शासनाने बंद केले आहे. त्या संबंधीचा जीआर शुक्रवारी काढण्यात आला.

२६ जून १९७५ ते २० मार्च १९७७ दरम्यान मिसाबंदी असलेल्यांना आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मासिक मानधन देणे सुरू केले होते. एक महिन्याहून अधिक काळ तुरुंगात असलेल्यांना मासिक दहा हजार रुपये तर एक महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी तुरुंगात असलेल्यांना मासिक पाच हजार रुपये मानधन दिले जात होते. जानेवारी २०१८ पासून सुरू करण्यात आलेले हे मानधन २७ महिने नियमित देण्यात आले.

राज्यातील तीन हजार मिसाबंदींना मात्र, गेल्या एप्रिलपासून ते बंद करण्यात आले. मिसाबंदींनी या बाबत शासनाकडे चौकशी केली असता तांत्रिक कारण असल्याचे तोंडी सांगितले जात होते. मात्र, आज हे मानधन कायमचे बंद करण्याचा आदेश काढण्यात आला.

या मानधनाच्या लाभार्र्थींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची संख्या अधिक होती. या शिवाय समाजवादी, सर्वोदयी कार्यकर्तेदेखील होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्याचे महसुली उत्पन्न घटलेले आहे. त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम लक्षात घेऊन आणिबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणाºया कार्यक्रमाची अंमलबजावणी आता बंद केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात म्हटले आहे.मानधन बंद करणे हा अन्यायकोरोनाच्या संकटकाळात हे मानधन स्थगित करण्यात आले असते तर शासनाची आर्थिक अडचण समजता आली असती. पण कोरोनाचे संकट आहे म्हणून योजनाच बंद करण्यामागे राजकीय उद्देश स्पष्ट दिसतो. लोकशाहीसाठी आम्ही मिसाबंदींनी लढा दिलेला होता आणि आजच्या शासनाच्या आदेशातही ती बाब मान्य केलेली असताना मानधन बंद करणे अन्याय आहे.- रवी कासखेडीकर, उपाध्यक्ष, अ.भा. लोकतंत्र सेनानी संघ

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ