शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे कारण देत मिसाबंदींचे मानधन बंद शासनाकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 06:12 IST

राज्य सरकारचा निर्णय; लाभार्र्थींमध्ये संघाच्या स्वयंसेवकांची संख्या अधिक

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९७५ च्या आणिबाणीत तुरुंगवास पत्काराव्या लागलेल्या मिसाबंदीचे मानधन राज्याची आर्थिक स्थिती कोरोनामुळे चांगली नसल्याचे कारण देत राज्य शासनाने बंद केले आहे. त्या संबंधीचा जीआर शुक्रवारी काढण्यात आला.

२६ जून १९७५ ते २० मार्च १९७७ दरम्यान मिसाबंदी असलेल्यांना आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मासिक मानधन देणे सुरू केले होते. एक महिन्याहून अधिक काळ तुरुंगात असलेल्यांना मासिक दहा हजार रुपये तर एक महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी तुरुंगात असलेल्यांना मासिक पाच हजार रुपये मानधन दिले जात होते. जानेवारी २०१८ पासून सुरू करण्यात आलेले हे मानधन २७ महिने नियमित देण्यात आले.

राज्यातील तीन हजार मिसाबंदींना मात्र, गेल्या एप्रिलपासून ते बंद करण्यात आले. मिसाबंदींनी या बाबत शासनाकडे चौकशी केली असता तांत्रिक कारण असल्याचे तोंडी सांगितले जात होते. मात्र, आज हे मानधन कायमचे बंद करण्याचा आदेश काढण्यात आला.

या मानधनाच्या लाभार्र्थींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची संख्या अधिक होती. या शिवाय समाजवादी, सर्वोदयी कार्यकर्तेदेखील होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्याचे महसुली उत्पन्न घटलेले आहे. त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम लक्षात घेऊन आणिबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणाºया कार्यक्रमाची अंमलबजावणी आता बंद केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात म्हटले आहे.मानधन बंद करणे हा अन्यायकोरोनाच्या संकटकाळात हे मानधन स्थगित करण्यात आले असते तर शासनाची आर्थिक अडचण समजता आली असती. पण कोरोनाचे संकट आहे म्हणून योजनाच बंद करण्यामागे राजकीय उद्देश स्पष्ट दिसतो. लोकशाहीसाठी आम्ही मिसाबंदींनी लढा दिलेला होता आणि आजच्या शासनाच्या आदेशातही ती बाब मान्य केलेली असताना मानधन बंद करणे अन्याय आहे.- रवी कासखेडीकर, उपाध्यक्ष, अ.भा. लोकतंत्र सेनानी संघ

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ