शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

मिरज जंक्शन आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार, मनोज सिन्हा यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:40 IST

देशातील प्राचीन रेल्वे स्टेशनमध्ये मिरज जंक्शनचा समावेश आहे. हे जंक्शन ए श्रेणीत असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार असल्याचे रेल्वे व दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले.

सांगली : देशातील प्राचीन रेल्वे स्टेशनमध्ये मिरज जंक्शनचा समावेश आहे. हे जंक्शन ए श्रेणीत असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार असल्याचे रेल्वे व दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले. रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलात ५० टक्के महिला पोलिसांची भरती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.येथील वालचंद महाविद्यालयाच्या आवारात आयोजित सांगली फर्स्ट या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर मंत्री सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिन्हा म्हणाले की, देशातील काही रेल्वे स्टेशन्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यात मिरजेचा समावेश आहे. २५ हजारांपेक्षा जागा प्रवाशांची रेलचेल असलेल्या स्टेशनचा विकास करण्यावर आम्ही भर दिला आहे. अ‍ॅक्सिलेटर लिफ्ट, वायफाय, सीसीटीव्ही या सुविधा देण्यास प्राधान्य दिले आहे. रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात टाळण्यासाठीही उपाययोजना केल्या आहेत. यात्रेकरूची सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे.रेल्वेत महिलांची छेडछाड, विनयभंग, चो-या यावर बोलताना ते म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम त्या राज्यातील सरकारचे आहे. रेल्वे विभागाकडे स्वतंत्र पोलीस दल आहे. शासन, रेल्वे विभाग व सुरक्षा दल यांनी एकत्रित काम करून अशा कृत्यांना पायबंद घालावा. रेल्वेत महिलांची छेडछाड व इतर प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलात ५० टक्के महिलांचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे. भाजपा सरकारच्या कामाचा पाढा वाचत सिन्हा म्हणाले की, यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी एक लाख ४७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेती विकासासाठी १४ लाख कोटी, शेतीमालाला दीडपट भाव, २२ हजार अत्याधुनिक भाजी मंडई उभारण्याचा संकल्प सोडला आहे. रेल्वे विभागाला अंदाजपत्रकात एक लाख ३८ कोटीची तरतूद केली आहे. देशातील दहा हजार कुटुंबांना आयुष्यमान भव योजनेतून औषधोपचरासाठी ५ लाखांपर्यंतची मदत केली जाणार आहे. १८ हजार खेड्यात वीज पोहोचू शकलेली नाही. त्यांच्यासाठी सौभाग्य योजना जाहीर केली. यातील १५ हजार ३६८ घरात वीज पोहोचली आहे. तर चार कोटी कुटुंबांना सौभाग्य योजनेतून मोफत वीज देण्यात येणार आहे. उज्ज्वला योजनेतून ५ कोटी महिलांना गॅस दिल्याचेही ते म्हणाले.पुणे-मिरज दुहेरीकरण २०२१ पर्यंत पूर्ण करणारपुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला सुरेश प्रभू मंत्री असताना मंजुरी मिळाली. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे. दुहेरीकरणाचे काम २०२१पर्यंत पूर्ण केले जाणार असून, त्यासाठी २४३६ कोटींची तरतूद केली आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर विद्युतीकरणासाठी ५६६ कोटींचा निधी दिला आहे. दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर आणखी जादा रेल्वे गाड्या सोडल्या जातील. क-हाड-चिपळूण रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम जिंदाल कंपनीकडून सुरू असल्याचे मंत्री सिन्हा यांनी सांगितले.