शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

मिरज जंक्शन आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार, मनोज सिन्हा यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:40 IST

देशातील प्राचीन रेल्वे स्टेशनमध्ये मिरज जंक्शनचा समावेश आहे. हे जंक्शन ए श्रेणीत असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार असल्याचे रेल्वे व दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले.

सांगली : देशातील प्राचीन रेल्वे स्टेशनमध्ये मिरज जंक्शनचा समावेश आहे. हे जंक्शन ए श्रेणीत असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार असल्याचे रेल्वे व दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले. रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलात ५० टक्के महिला पोलिसांची भरती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.येथील वालचंद महाविद्यालयाच्या आवारात आयोजित सांगली फर्स्ट या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर मंत्री सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिन्हा म्हणाले की, देशातील काही रेल्वे स्टेशन्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यात मिरजेचा समावेश आहे. २५ हजारांपेक्षा जागा प्रवाशांची रेलचेल असलेल्या स्टेशनचा विकास करण्यावर आम्ही भर दिला आहे. अ‍ॅक्सिलेटर लिफ्ट, वायफाय, सीसीटीव्ही या सुविधा देण्यास प्राधान्य दिले आहे. रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात टाळण्यासाठीही उपाययोजना केल्या आहेत. यात्रेकरूची सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे.रेल्वेत महिलांची छेडछाड, विनयभंग, चो-या यावर बोलताना ते म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम त्या राज्यातील सरकारचे आहे. रेल्वे विभागाकडे स्वतंत्र पोलीस दल आहे. शासन, रेल्वे विभाग व सुरक्षा दल यांनी एकत्रित काम करून अशा कृत्यांना पायबंद घालावा. रेल्वेत महिलांची छेडछाड व इतर प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलात ५० टक्के महिलांचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे. भाजपा सरकारच्या कामाचा पाढा वाचत सिन्हा म्हणाले की, यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी एक लाख ४७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेती विकासासाठी १४ लाख कोटी, शेतीमालाला दीडपट भाव, २२ हजार अत्याधुनिक भाजी मंडई उभारण्याचा संकल्प सोडला आहे. रेल्वे विभागाला अंदाजपत्रकात एक लाख ३८ कोटीची तरतूद केली आहे. देशातील दहा हजार कुटुंबांना आयुष्यमान भव योजनेतून औषधोपचरासाठी ५ लाखांपर्यंतची मदत केली जाणार आहे. १८ हजार खेड्यात वीज पोहोचू शकलेली नाही. त्यांच्यासाठी सौभाग्य योजना जाहीर केली. यातील १५ हजार ३६८ घरात वीज पोहोचली आहे. तर चार कोटी कुटुंबांना सौभाग्य योजनेतून मोफत वीज देण्यात येणार आहे. उज्ज्वला योजनेतून ५ कोटी महिलांना गॅस दिल्याचेही ते म्हणाले.पुणे-मिरज दुहेरीकरण २०२१ पर्यंत पूर्ण करणारपुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला सुरेश प्रभू मंत्री असताना मंजुरी मिळाली. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे. दुहेरीकरणाचे काम २०२१पर्यंत पूर्ण केले जाणार असून, त्यासाठी २४३६ कोटींची तरतूद केली आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर विद्युतीकरणासाठी ५६६ कोटींचा निधी दिला आहे. दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर आणखी जादा रेल्वे गाड्या सोडल्या जातील. क-हाड-चिपळूण रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम जिंदाल कंपनीकडून सुरू असल्याचे मंत्री सिन्हा यांनी सांगितले.