शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

काँग्रेसकडून अल्पसंख्याक जोडो अभियान

By admin | Updated: November 19, 2016 03:26 IST

पालघर जिल्हातील दुरावलेले अल्पसंख्याक व मुस्लिम समाजाला पुन्हा काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली टेन मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे सभा घेण्यात आली

मनोर/पालघर : पालघर जिल्हातील दुरावलेले अल्पसंख्याक व मुस्लिम समाजाला पुन्हा काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली टेन मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी पालघर जिल्हयाचे आठ तालुक्यातील ख्रिश्चन, पंजाबी, गुजराती, दलित, मुस्लिम व इतर समाजातील अल्पसंख्याक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांची संख्या लक्षणिय होती. सभेचे आयोजन अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्तफा मेमन व तालुका अध्यक्ष असिफ मेमन यांनी केले होते.अल्पसंख्याकांना संबोधित करतांना खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, कॉग्रेस शिवाय पर्याय नाही म्हणू आपण मतभेद सोडून पुन्हा कार्याला सुरवात करा व पक्ष बळकट बनवा. ज्या अल्पसंख्याक समजाला त्यांचे हक्क मिळाले नाही ते सत्तेवर आल्यावर प्रथम प्राधान्य देऊन मिळवून देऊ असे आश्वासन दिले. या वेळी डहाणूचे नगरसेवक नदिम शेख यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीकडून कॉँग्रस भवनाचा ताबा घेतला गेल्याचा विषय एैरणीवर आणला. यावेळी बहुजन विकास,राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तरु ण कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दनान धांगे हे म्हणाले की, आज अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासाठी महाविद्यालय नाही उर्दू शाळेमध्ये शिक्षक नाही. असे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. शमीम शेख यांनी आपल्या भाषणात मुलींना शाळा, महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळत नाही, सरकारी नोकऱ्यांपासून समाज दुरावलेला आहे, शासकीय कार्यालयात गेले तर कामे होत नाही, पोलीस ठाण्यात न्याय मिळत नाही असे अनेक प्रश्न मांडले. यावेळी माजी मंत्री राजेंद्र गावित, जिल्हा अध्यक्ष मनीष गणवरे , महिला अध्यक्ष शमीम शेख उपस्थिती होते. (वार्ताहर)>मुस्लिम तरुणीची धाडसी कैफियतकार्यक्रम सुरु असतांना पुरुष मंडळींनी समाजाचे प्रतिनिधीत्व करुन समस्या मांडत असतांनाच अचानक मुस्लिम समाजातील एक तरु णी आयशा मेमन हिने व्यासपीठावर येऊन माईकचा ताबा घेतला. ती धाडसाने बोलली की, मुस्लिम समाजाच्या मुलींना शिक्षणासाठी पुढे यायला पाहिजे. आधुनिक शिक्षण घेण्यासाठी मुलींना संघर्ष करावा लागतो. तसे न करण्यासाठी घरातून व समाजातून अनेक बंधने लादली जातात. मुस्लिम समाजातील स्त्री जिवन सुधारण्यासाठी त्यांना शिक्षण व सरकारी नोकरी हाच एक मार्ग असल्याने तिने ठामपणे सांगितले.