शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच, राज्यमंत्री सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 07:07 IST

Satej Patil : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, व्यक्तींना ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार’ देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच घेण्यात आला होता. केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या आधीच त्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे या दोन्हींचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट करतानाच, राज्यात पाच विभागात हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरस्कारांसाठी आयटी इंजिनियरिंग सर्व्हिस सॉफ्टवेअर, आयटी एनेबल्ड सर्व्हिस (बीपीओ/केपीओ), आयटी इंफ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर), मोस्ट प्रॉमिसिंग स्टार्टअप आणि स्पेशल अवॉर्ड फॉर कॉन्ट्रिब्युशन टू महाराष्ट्र असे पाच विभाग करण्यात आले आहेत. या पाच विभागात पुरस्कारांची निवड होणार असून मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार असल्याचे राज्यमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावर्षीच्या पुरस्कारांचे  वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आज २० तारखेला राजीव गांधी यांच्या जयंती दिनापासून नामांकनासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. १५ सप्टेंबर २०२१ ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असेल, तर २० ऑक्टोबरपर्यंत छाननी समितीच्या सर्व बैठका पार पडतील. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधी