शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच, राज्यमंत्री सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 07:07 IST

Satej Patil : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, व्यक्तींना ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार’ देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच घेण्यात आला होता. केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या आधीच त्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे या दोन्हींचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट करतानाच, राज्यात पाच विभागात हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरस्कारांसाठी आयटी इंजिनियरिंग सर्व्हिस सॉफ्टवेअर, आयटी एनेबल्ड सर्व्हिस (बीपीओ/केपीओ), आयटी इंफ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर), मोस्ट प्रॉमिसिंग स्टार्टअप आणि स्पेशल अवॉर्ड फॉर कॉन्ट्रिब्युशन टू महाराष्ट्र असे पाच विभाग करण्यात आले आहेत. या पाच विभागात पुरस्कारांची निवड होणार असून मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार असल्याचे राज्यमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावर्षीच्या पुरस्कारांचे  वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आज २० तारखेला राजीव गांधी यांच्या जयंती दिनापासून नामांकनासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. १५ सप्टेंबर २०२१ ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असेल, तर २० ऑक्टोबरपर्यंत छाननी समितीच्या सर्व बैठका पार पडतील. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधी