शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली मृत शेतकरी कुटुंबाला भेट, रुग्णालयातील शेतक-यांचीही केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 18:01 IST

किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यु झालेल्या शेतक-याच्या कुटुंबाला कृषी व फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. आर्णी  तालुक्यातील शेंदुरसनी येथील दीपक मडावी यांचा गत महिन्यात विषबाधेमुळे मृत्यू झाला होता.

यवतमाळ - किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यु झालेल्या शेतक-याच्या कुटुंबाला कृषी व फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. आर्णी  तालुक्यातील शेंदुरसनी येथील दीपक मडावी यांचा गत महिन्यात विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मृतक दीपक मडावी यांचे वडील श्याम मडावी, दीपकची पत्नी आणि मुलगी वैष्णवीचे सांत्वन केले. यावेळी कृषी उपसंचालक पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, आत्माचे प्रकल्प संचालक दत्ता काळे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, कृषी विस्तार अधिकारी डी.आर.कळसाईत आदी उपस्थित होते.यावेळी राज्यमंत्री खोत यांनी श्याम मडावी यांच्याशी चर्चा केली. गावात कृषी विभागाचे अधिकारी येतात का. फवारणी करतांना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहायक तसेच औषधी विक्रेते व किटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी गावातील नागरिकांना मार्गदर्शन करतात का. गावात ग्रामसेवक किती दिवासांनी येतात. विषबाधा झाल्यानंतर दीपक किती दिवस दवाखान्यात भरती होते, याबाबत विचारणा केली. यावेळी श्याम मडावी यांनी सांगितले की, दीपक तीन दिवसांपासून फवारणी करत होता. बाहेर रोजंदारीवरसुध्दा फवारणीसाठीसुध्दा जात होता. दोन-तीन दिवसानंतर त्याची तब्बेत बिघडली आणि रुग्णालयात दाखल केले. पाच दिवसानंतर दीपकचा मृत्यू झाला.  घरी चार एकर शेती आहे. एक एकर त्याला मक्त्याने दिली होती. सातबारा माझ्याच नावावर आहे. कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आठवड्यातून एक-दोनदा येतात, असे श्याम मडावी यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री खोत यांनी दीपकच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश दिले. तसेच ग्रामसेवक, कृषी सहायक, मंडळ अधिकारी यांनी नियमित गावात येऊन नागरिकांना फवारणीसंदर्भात मार्गदर्शन करावे. ग्रामपंचायतीमध्ये याबाबत नोंदी अद्ययावत ठेवाव्यात आदी सुचना केल्या. राज्यमंत्री खोत यांनी दीपक मडावी ज्या शेतावर फवारणी करण्यासाठी गेले होते त्या शेतावर भेट दिली. तसेच लोणबेहळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. फवारणीबाधीत किती शेतकरी या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आले होते. त्यांना कुठे रेफर करण्यात आले, आदी बाबींची त्यांनी विचारपूस केली. राज्यमंत्र्यांची रुग्णालयाला भेट : राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन भरती असलेल्या विषबाधीत शेतक-यांची विचारपूस केली. त्यांच्या नातेवाईकांना यावेळी त्यांनी धीर दिला. या रुग्णांच्या वैद्यकीय खर्चासाठी त्वरीत तरतूद करावी, असे निर्देश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. राठोड, मेडीसीन विभगाचे डॉ. येलके आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत FarmerशेतकरीAmravatiअमरावती