शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या; रामदास आठवले यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 13:43 IST

Coronavirus : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनीदेखील केली होती मागणी

ठळक मुद्दे देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे.यापूर्वी राज ठाकरे यांनीदेखील केली होती मागणी

"महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णसंख्या हजारोच्या संख्येने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकेल. त्यामुळे  राज्यात दहावी आणि बारावी च्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात," अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. "महाराष्ट्रच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आणि स्वागतार्ह आहे. त्या प्रमाणेच १० वी आणि १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी," अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. राज ठाकरेंनीही केली होती मागणी"राज्यातील शाळा बंद आहेत, पण शाळांकडून फी आकारणी सुरूच आहे. एक तर विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलंय. आता दहावी बारावीच्या परीक्षा होत आहेत, पण या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करायला हवं. कारण, ते कोणत्या मानसिकतेत असतील हे सांगता येत नाही, ते लहान आहेत. त्यांच्या मानसिकतेचा विचार व्हायरला हवा. पहिल्यांदाच आपल्यावर हा प्रसंग ओढवलाय. त्यामुळे, मी राज्य सरकारला विनंती करत आहे की, खालच्या विद्यार्थ्यांना जसं प्रमोट केलंय, तसं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढे ढकलावं," असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं होतं. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेexamपरीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे