शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

राज्यात नवं समीकरण! MIM ची शरद पवारांना ऑफर; शिवसेनेची कोंडी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 10:33 IST

राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस –राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसायला लागलं

औरंगाबाद – राज्यात मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना यांच्यात दरी निर्माण झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ऐतिहासिक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपाविरोधी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देत राज्यात सत्ता मिळवली. अलीकडेच भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याने मविआचे २५ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. त्यातच दुसरीकडे ओवैसी यांच्या MIM नं महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची तयारी केली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील(MIM Imtiaz Jalil) यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांच्यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपर्यंत(NCP Sharad Pawar)) निरोप पोहोचवा अशी विनंती केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जलील यांनी केलेल्या राजकीय खेळीवर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं गरजेचे आहे. एमआयएमने काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिली आहे. भाजपाला हरवायचं असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवं असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. ABP दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस –राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसायला लागलं. मात्र कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याने भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन शिवसेनेवर प्रहार करणं सुरू केले आहे. त्यात आता MIM जर महाविकास आघाडीसोबत गेली तर भाजपाला आयतं कोलीत सापडणार आहे. शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादाचा मुद्दा मुद्दा जलील यांना विचारताच भाजपाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हणाले.

राज्यात येऊ घातलेल्या आगामी महापालिका निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, ठाणे यासारख्या महापालिकांचा समावेश आहे. त्यामुळे MIM नं महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी केली आहे. हा निरोप शरद पवारांपर्यंत पोहचवण्याची विनंती जलील यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना केली आहे. जलील म्हणाले की, MIM मुळे भाजपा जिंकते असा आरोप आमच्यावर केला जातो. मग आम्ही ऑफर देतो हे एकदा संपवायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करणार का? त्यावर ते काहीही बोलत नाहीत. नुसते आरोप करू नका भूमिका सिद्ध करा असं आव्हान जलील यांनी दिलं आहे.

शिवसेनेची भूमिका

इम्तियाज जलील यांच्या ऑफरवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,  राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. चौथा, पाचवा कोण असेल याची आतापासूनच चर्चा करण्याची गरज नाही. जे भाजपासोबत छुप्या युतीत काम करत आहेत, त्यांच्याशी महाविकास आघाडीत संबंध येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जे औरंगजेबाला मानतात त्यांचा शिवरायांना मानणाऱ्यांशी कोणताही संबंध येत नाही. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे. सर्व राज्यांत आपण हे पाहिलेले आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणाऱ्यांसोबत आमची आघाडी कशी होईल, हे तुम्ही कसा विचार करू शकता. त्यांना दूरुनच नमस्कार असं सांगत शिवसेनेने MIM सोबत आघाडी करण्यास नकार दिला आहे.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारImtiaz Jalilइम्तियाज जलील