शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

महाराष्ट्राचा मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?; खा. इम्तियाज जलील यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 08:13 IST

५ टक्के मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमनं आवाज उचलला आहे. त्यात सर्वपक्षीय मुस्लिमांनी सहभागी व्हावं. हा राजकीय मुद्दा नाही तर मुस्लीम समाजाचा मुद्दा आहे असंही खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

औरंगाबाद – मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्याचा आरोप करत एमआयएमची तिरंगा यात्रा मुंबईसाठी रवाना झाली आहे. पोलिसांचा दबाव आणून AIMIM ची रॅली अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा जेव्हा आम्ही हॉल, मैदान बुक करायला गेलो तिथं शिवसेना आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जाऊन आयोजकांना धमकी देत कार्यक्रम रद्द करायला भाग पाडायचे. आमच्यावर अनेक निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला. मात्र चांदिवली येथील शाळेत सभेला परवानगी मिळाली आहे. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सभा घेतील अशी माहिती औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

शनिवारी सकाळी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात तिरंगा रॅली औरंगाबादहून मुंबईसाठी रवाना झाली. यावेळी इम्तियाज जलील(MP Imtiyaj Jalil) म्हणाले की, मुंबईला येताना तिरंगा झेंडा लावू नका असा आदेश पोलिसांनी दिला. हा आमच्या पक्षाचा झेंडा नाही. आमच्या स्वाभिमानाचा हा झेंडा आहे. महाराष्ट्राचा मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का? आम्ही सरकारला प्रश्न विचारायला जातोय. मुस्लीम आरक्षणाबाबत काय करताय? वक्फ बोर्डाची ९३ हजार एकर जमिनी कोणी लाटल्या? सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या जमिनी हडप केल्यात. हे प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय. भाजपा-शिवसेना काळात काँग्रेस-राष्ट्रवादी मुस्लीम आरक्षणावर इतकं भांडत होते. मुस्लिमांना आरक्षण का देत नाही असं काँग्रेस-राष्ट्रवादीवाले विचारत होते. मात्र आता हे सत्तेत आहेत त्यावर काहीच बोलायला तयार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच हा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. मुस्लीम समाजावर अन्याय झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षांसह इतर पक्षातील सगळ्या मुस्लीम नेत्यांनाही निमंत्रण पाठवलं आहे. ५ टक्के मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमनं आवाज उचलला आहे. त्यात सर्वपक्षीय मुस्लिमांनी सहभागी व्हावं. हा राजकीय मुद्दा नाही तर मुस्लीम समाजाचा मुद्दा आहे असंही खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

राज्यभरातून MIM कार्यकर्ते मुंबईत धडकणार

मुस्लीम आरक्षण( Muslim Reservation) आणि वक्फ बोर्डच्या प्रश्नावर एमआयएमची ( MIM ) तिरंगा यात्रा शनिवारी मुंबईत धडकणार आहे. या रॅलीत प्रत्येक वाहनावर तिरंगा असेल, शनिवारी पहाटे औरंगाबाद येथून अहमदनगर, पुणे मार्गे सर्वजण मुंबईला पोहचतील, तर राज्यातील अनेक जिल्ह्यातून वाहने थेट मुंबईत येतील, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaj Jalil ) यांनी दिली आहे.

 

टॅग्स :Muslimमुस्लीमImtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन