शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

MIM खासदार इम्तियाज जलील यांची ऑफर; राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपेंची सावध भूमिका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 16:13 IST

आता असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM नं महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना यांच्यात दरी निर्माण झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. भाजपाविरोधी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देत राज्यात सत्ता मिळवली. परंतु आता असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM नं महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची ऑफर दिली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील(MIM Imtiaz Jalil) यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांच्यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपर्यंत(NCP Sharad Pawar)) निरोप पोहोचवा अशी विनंती केली. परंतु यावर राजेश टोपे यांनी सावध भूमिका घेत पक्षश्रेष्ठी याचा निर्णय घेतील असं म्हटलंय.

"जे काही एमआयएमला बोलायचं असेल ते त्यांनी पक्षश्रेष्ठींशी बोलावं. ते जे निर्णय घेतील ते सर्वांना मान्य असेल. आमच्या अल्पसंख्यांकांची काळजी घेणारा कोणताही पक्ष असेल त्यांना आम्ही साथ देऊ असं जलिल म्हणाले. त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं," असं राजेश टोपे म्हणाले. त्या सामान्य गप्पा होत्या. उत्तर प्रदेशबाबतही आम्ही गप्पा केल्या. उत्तर प्रदेशात एमआयएममुळे काही १०-१५ जागांवर पराभव झाला असा आमचा अभ्यास आहे. अन्यथा १०-१५ जागा वाढल्या असता. जातीयवादी पक्षांना मदत होईल असं का वागता, काय धोरणं आहे असं त्यांना विचारलं," असंही त्यांनी सांगितलं.

आमचं म्हणणं काही नाही. अल्पसंख्यांक समाजाचा विकास व्हावा ही आमची धारणा आहे. आमचा प्रश्न सोडवणार पक्ष असेल त्यांच्यासोबत आम्ही कधीही येऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं. जे काही तुमचं म्हणणं आहे ते महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला बोला असं त्यांना सांगितल्याचंही टोपेंनी नमूद केलं. गप्पांमधील हे विषय आहेत. ज्या काही गोष्टी असतात ते पक्षश्रेष्ठी ठरवतात. आम्ही कार्यकर्ते आहोत आम्हाला तो अधिकार नसतो. आमच्या अनौपचारिक चर्चा होत्या. मला याबाबत बोलण्याचा अधिकार नसल्याचंही ते म्हणाले. 

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनRajesh Topeराजेश टोपेImtiaz Jalilइम्तियाज जलील