शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

फुलशेतीतून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:23 IST

यशकथा : दुर्गापूर येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील २० वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात.

- यमन पुलाटे (लोणी, जि. नगर) 

फुलशेतू ही शेतकऱ्याला चांगलीच मालामाल करू शकते; पण यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्याची गरज आहे. असे केले तर ही शेती कमी खर्चात लाखांचे उत्पादन देणारी आहे, असा अनुभव नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील शेतकरी लक्ष्मण पुलाटे यांचा आहे.दुर्गापूर येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील २० वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात. सुरुवातीला अनेक प्रश्न, समस्या त्यांच्यासमोर होत्या; पण बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रातील विस्तार विभागाचे प्रमुख सुनील बोरुडे यांनी या फूल उत्पादकांना एकत्र करीत शेतकरी गटांची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून फुलशेतीला चांगले दिवस आले, असे लक्ष्मण पुलाटे सांगतात. येथील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, भरत दवणे, शांताराम सोनवणे यांनी लागवड, खत व्यवस्थापन, पीकसंरक्षण बाजारपेठ याची माहिती दिल्याने फुलशेतीला चांगले दिवस आले.

आज या शेतीच्या माध्यमातून फुलशेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर सध्या भर दिल्याने पूर्वीपेक्षा खर्चात ३० ते ४० टक्के बचत झाली आहे. झेंडू पिकांची लागवड जून-जुलै, डिसेंबर-जानेवारी अशा दोन वेळेस करता येते. लागवडीपूर्वी चांगली मशागत करून चार फुटांच्या बेडवर एक टन गांडूळ खत, निंबोळी पेंड याबरोबर जैविक बुरशीनाशके आणि जिवाणू खतांचा वापर करून लागवड केली जाते. प्रत्येक वेळी लागवडीपूर्वी माती परीक्षण करून ८० टक्के  सेंद्रिय खते, तर २० टक्के  रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे खर्चात बचत, फुलांची गुणवत्ता, झाडांची वाढ चांगली होते. लागवडीनंतर दोन तोडणीनंतर व्हर्मीवॉश आणि शेण-गोमूत्र स्लरीचा आलटून पालटून ठिबक आणि फवारणीतून वापर करण्यात येतो. गरज असेल तर विद्राव्य खतांचा वापर करतात. शेवंती आणि बिजली हे स्थानिक वाण तर झेंडूसाठी आफ्रिकन यलो, गोल्ड स्पॉट, अप्सरा यलो या वाणांचा वापर केला जातो.

बागायती भागात आणि जिरायती भागात फुलशेती करता येते. पिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. प्रत्येक संकटासोबत संधी असते ती शोधून काम करणारा पुढे जाऊ शकतो. यासाठी ग्रुप संघटन आणि पीक गट यांचा फायदा होतो, असेही पुलाटे यांनी सांगितले. सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. पितृ पंधरवडा संपल्यानंतर नवरात्रीला प्रारंभ होईल. त्यानंतर दसरा, दिवाळी सण आहे. फुलांच्या दृष्टीने हे तीनही सण अत्यंत महत्त्वाचे असून, या दरम्यान फुलांना प्रचंड मागणी असते. आवक कमी झाल्यास फुलांचे दर वाढतात आणि जास्त झाल्यास दर घटतात, असा अनुभव आहे. तथापि, यातूनही चार पैसे हातात पडून दसरा, दिवाळी सण उत्साहात साजरा करण्याची योजना शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र