शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

फुलशेतीतून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:23 IST

यशकथा : दुर्गापूर येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील २० वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात.

- यमन पुलाटे (लोणी, जि. नगर) 

फुलशेतू ही शेतकऱ्याला चांगलीच मालामाल करू शकते; पण यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्याची गरज आहे. असे केले तर ही शेती कमी खर्चात लाखांचे उत्पादन देणारी आहे, असा अनुभव नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील शेतकरी लक्ष्मण पुलाटे यांचा आहे.दुर्गापूर येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील २० वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात. सुरुवातीला अनेक प्रश्न, समस्या त्यांच्यासमोर होत्या; पण बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रातील विस्तार विभागाचे प्रमुख सुनील बोरुडे यांनी या फूल उत्पादकांना एकत्र करीत शेतकरी गटांची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून फुलशेतीला चांगले दिवस आले, असे लक्ष्मण पुलाटे सांगतात. येथील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, भरत दवणे, शांताराम सोनवणे यांनी लागवड, खत व्यवस्थापन, पीकसंरक्षण बाजारपेठ याची माहिती दिल्याने फुलशेतीला चांगले दिवस आले.

आज या शेतीच्या माध्यमातून फुलशेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर सध्या भर दिल्याने पूर्वीपेक्षा खर्चात ३० ते ४० टक्के बचत झाली आहे. झेंडू पिकांची लागवड जून-जुलै, डिसेंबर-जानेवारी अशा दोन वेळेस करता येते. लागवडीपूर्वी चांगली मशागत करून चार फुटांच्या बेडवर एक टन गांडूळ खत, निंबोळी पेंड याबरोबर जैविक बुरशीनाशके आणि जिवाणू खतांचा वापर करून लागवड केली जाते. प्रत्येक वेळी लागवडीपूर्वी माती परीक्षण करून ८० टक्के  सेंद्रिय खते, तर २० टक्के  रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे खर्चात बचत, फुलांची गुणवत्ता, झाडांची वाढ चांगली होते. लागवडीनंतर दोन तोडणीनंतर व्हर्मीवॉश आणि शेण-गोमूत्र स्लरीचा आलटून पालटून ठिबक आणि फवारणीतून वापर करण्यात येतो. गरज असेल तर विद्राव्य खतांचा वापर करतात. शेवंती आणि बिजली हे स्थानिक वाण तर झेंडूसाठी आफ्रिकन यलो, गोल्ड स्पॉट, अप्सरा यलो या वाणांचा वापर केला जातो.

बागायती भागात आणि जिरायती भागात फुलशेती करता येते. पिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. प्रत्येक संकटासोबत संधी असते ती शोधून काम करणारा पुढे जाऊ शकतो. यासाठी ग्रुप संघटन आणि पीक गट यांचा फायदा होतो, असेही पुलाटे यांनी सांगितले. सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. पितृ पंधरवडा संपल्यानंतर नवरात्रीला प्रारंभ होईल. त्यानंतर दसरा, दिवाळी सण आहे. फुलांच्या दृष्टीने हे तीनही सण अत्यंत महत्त्वाचे असून, या दरम्यान फुलांना प्रचंड मागणी असते. आवक कमी झाल्यास फुलांचे दर वाढतात आणि जास्त झाल्यास दर घटतात, असा अनुभव आहे. तथापि, यातूनही चार पैसे हातात पडून दसरा, दिवाळी सण उत्साहात साजरा करण्याची योजना शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र