शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

फुलशेतीतून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:23 IST

यशकथा : दुर्गापूर येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील २० वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात.

- यमन पुलाटे (लोणी, जि. नगर) 

फुलशेतू ही शेतकऱ्याला चांगलीच मालामाल करू शकते; पण यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्याची गरज आहे. असे केले तर ही शेती कमी खर्चात लाखांचे उत्पादन देणारी आहे, असा अनुभव नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील शेतकरी लक्ष्मण पुलाटे यांचा आहे.दुर्गापूर येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील २० वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात. सुरुवातीला अनेक प्रश्न, समस्या त्यांच्यासमोर होत्या; पण बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रातील विस्तार विभागाचे प्रमुख सुनील बोरुडे यांनी या फूल उत्पादकांना एकत्र करीत शेतकरी गटांची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून फुलशेतीला चांगले दिवस आले, असे लक्ष्मण पुलाटे सांगतात. येथील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, भरत दवणे, शांताराम सोनवणे यांनी लागवड, खत व्यवस्थापन, पीकसंरक्षण बाजारपेठ याची माहिती दिल्याने फुलशेतीला चांगले दिवस आले.

आज या शेतीच्या माध्यमातून फुलशेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर सध्या भर दिल्याने पूर्वीपेक्षा खर्चात ३० ते ४० टक्के बचत झाली आहे. झेंडू पिकांची लागवड जून-जुलै, डिसेंबर-जानेवारी अशा दोन वेळेस करता येते. लागवडीपूर्वी चांगली मशागत करून चार फुटांच्या बेडवर एक टन गांडूळ खत, निंबोळी पेंड याबरोबर जैविक बुरशीनाशके आणि जिवाणू खतांचा वापर करून लागवड केली जाते. प्रत्येक वेळी लागवडीपूर्वी माती परीक्षण करून ८० टक्के  सेंद्रिय खते, तर २० टक्के  रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे खर्चात बचत, फुलांची गुणवत्ता, झाडांची वाढ चांगली होते. लागवडीनंतर दोन तोडणीनंतर व्हर्मीवॉश आणि शेण-गोमूत्र स्लरीचा आलटून पालटून ठिबक आणि फवारणीतून वापर करण्यात येतो. गरज असेल तर विद्राव्य खतांचा वापर करतात. शेवंती आणि बिजली हे स्थानिक वाण तर झेंडूसाठी आफ्रिकन यलो, गोल्ड स्पॉट, अप्सरा यलो या वाणांचा वापर केला जातो.

बागायती भागात आणि जिरायती भागात फुलशेती करता येते. पिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. प्रत्येक संकटासोबत संधी असते ती शोधून काम करणारा पुढे जाऊ शकतो. यासाठी ग्रुप संघटन आणि पीक गट यांचा फायदा होतो, असेही पुलाटे यांनी सांगितले. सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. पितृ पंधरवडा संपल्यानंतर नवरात्रीला प्रारंभ होईल. त्यानंतर दसरा, दिवाळी सण आहे. फुलांच्या दृष्टीने हे तीनही सण अत्यंत महत्त्वाचे असून, या दरम्यान फुलांना प्रचंड मागणी असते. आवक कमी झाल्यास फुलांचे दर वाढतात आणि जास्त झाल्यास दर घटतात, असा अनुभव आहे. तथापि, यातूनही चार पैसे हातात पडून दसरा, दिवाळी सण उत्साहात साजरा करण्याची योजना शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र