शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

फुलशेतीतून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:23 IST

यशकथा : दुर्गापूर येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील २० वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात.

- यमन पुलाटे (लोणी, जि. नगर) 

फुलशेतू ही शेतकऱ्याला चांगलीच मालामाल करू शकते; पण यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्याची गरज आहे. असे केले तर ही शेती कमी खर्चात लाखांचे उत्पादन देणारी आहे, असा अनुभव नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील शेतकरी लक्ष्मण पुलाटे यांचा आहे.दुर्गापूर येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील २० वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात. सुरुवातीला अनेक प्रश्न, समस्या त्यांच्यासमोर होत्या; पण बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रातील विस्तार विभागाचे प्रमुख सुनील बोरुडे यांनी या फूल उत्पादकांना एकत्र करीत शेतकरी गटांची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून फुलशेतीला चांगले दिवस आले, असे लक्ष्मण पुलाटे सांगतात. येथील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, भरत दवणे, शांताराम सोनवणे यांनी लागवड, खत व्यवस्थापन, पीकसंरक्षण बाजारपेठ याची माहिती दिल्याने फुलशेतीला चांगले दिवस आले.

आज या शेतीच्या माध्यमातून फुलशेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर सध्या भर दिल्याने पूर्वीपेक्षा खर्चात ३० ते ४० टक्के बचत झाली आहे. झेंडू पिकांची लागवड जून-जुलै, डिसेंबर-जानेवारी अशा दोन वेळेस करता येते. लागवडीपूर्वी चांगली मशागत करून चार फुटांच्या बेडवर एक टन गांडूळ खत, निंबोळी पेंड याबरोबर जैविक बुरशीनाशके आणि जिवाणू खतांचा वापर करून लागवड केली जाते. प्रत्येक वेळी लागवडीपूर्वी माती परीक्षण करून ८० टक्के  सेंद्रिय खते, तर २० टक्के  रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे खर्चात बचत, फुलांची गुणवत्ता, झाडांची वाढ चांगली होते. लागवडीनंतर दोन तोडणीनंतर व्हर्मीवॉश आणि शेण-गोमूत्र स्लरीचा आलटून पालटून ठिबक आणि फवारणीतून वापर करण्यात येतो. गरज असेल तर विद्राव्य खतांचा वापर करतात. शेवंती आणि बिजली हे स्थानिक वाण तर झेंडूसाठी आफ्रिकन यलो, गोल्ड स्पॉट, अप्सरा यलो या वाणांचा वापर केला जातो.

बागायती भागात आणि जिरायती भागात फुलशेती करता येते. पिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. प्रत्येक संकटासोबत संधी असते ती शोधून काम करणारा पुढे जाऊ शकतो. यासाठी ग्रुप संघटन आणि पीक गट यांचा फायदा होतो, असेही पुलाटे यांनी सांगितले. सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. पितृ पंधरवडा संपल्यानंतर नवरात्रीला प्रारंभ होईल. त्यानंतर दसरा, दिवाळी सण आहे. फुलांच्या दृष्टीने हे तीनही सण अत्यंत महत्त्वाचे असून, या दरम्यान फुलांना प्रचंड मागणी असते. आवक कमी झाल्यास फुलांचे दर वाढतात आणि जास्त झाल्यास दर घटतात, असा अनुभव आहे. तथापि, यातूनही चार पैसे हातात पडून दसरा, दिवाळी सण उत्साहात साजरा करण्याची योजना शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र