शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दूध झाले अति; भावाची माती, सरकारने द्यावी गती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 09:47 IST

खासगी कंपन्यांना सहा महिन्यांपूर्वी असे वाटत होते की, देशामध्ये दुधाची प्रचंड टंचाई निर्माण होईल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही दूध पावडरला चांगला भाव राहील आणि पावडर निर्यात करून चांगला पैसा कमविता येईल.

- राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ज्यामध्ये अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर झाला असून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३८ रुपये लिटरवरून २२ ते २६ रुपयांनी दूध विकावे लागत आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. या संकटास मोठ्या खासगी दूध कंपन्यांचा लोभ कारणीभूत आहे. त्यातच पृष्ठकाळ सुरू झाल्याने दूध अतिरिक्त झाले आहे.

खासगी कंपन्यांना सहा महिन्यांपूर्वी असे वाटत होते की, देशामध्ये दुधाची प्रचंड टंचाई निर्माण होईल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही दूध पावडरला चांगला भाव राहील आणि पावडर निर्यात करून चांगला पैसा कमविता येईल. या स्वार्थी हेतूने या सर्व कंपन्यांनी भांडवलाचा उपयोग करून दूध खरेदीमध्ये चढाओढ सुरू केली. त्यामुळे दुधाचे खरेदी दर ३८ रुपयांपर्यंत वाढत गेले. मात्र, सर्वांचाच अंदाज चुकला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्या नाहीत. बटर व दूध पावडरचे साठे शिल्लक राहिले.  

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या दुधाची पावडर २२० रुपये व बटरचे दर ३१० रुपयांपर्यंत कोसळल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दुधाचे भाव ३४ रुपयांपर्यंत स्थिर ठेवायचे असतील तर दूध पावडर निर्यातीसाठी किमान १०० रुपये प्रतिकिलो निर्यात अनुदान द्यावे लागेल. सरकारने पुढाकार घेऊन ३४ रुपयांचा दुधाचा खरेदीचा दर ठेवण्याच्या अटीवर हे अनुदान दिल्यास उत्पादकांना ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. दुधाला ३४ रुपये दर मिळणे सहज शक्य आहे. दररोज ३२ लाख लिटर दुधापासून तयार होणाऱ्या २६३ टन दूध पावडरीस १०० रुपये प्रति किलो हिशेबाने २ कोटी ६३ लाख रुपये दैनंदिन अनुदान द्यावे, अशा पद्धतीने हा पृष्ठकाळ साधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत चालेल. म्हणजेच ६० दिवसांस १५७ कोटी ८० लाख इतके अनुदान द्यावे लागेल, शिवाय छोटे दूध संघ कृषकाळात पावडरीचे उत्पादन करून ठेवतात, त्यांनाही शेतकऱ्यांना ३४ रुपये दुधाचा भाव देण्याच्या अटीवर त्यांच्याकडील अतिरिक्त दुधाची बाहेरच्या कंपन्यांकडून पावडर करून घ्यावी. त्यास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिल्यास तेही तयार होतील. यासाठी शासनाला केवळ ५०० ते ६०० कोटी रुपये खर्च येईल. ही योजना १५ फेब्रुवारीपर्यंत लागू केल्यास १ कोटीहून अधिक उत्पादकांना थेट फायदा होईल.

ही झाली तात्पुरती मलमपट्टी. कायमस्वरूपी उपाययोजना करायची असेल तर महानंद व इतर सरकारी दूध संघांचे एकत्रीकरण करून त्यामध्ये व्यावसायिकता आणली पाहिजे. ५१ टक्क्यांहून अधिक हिस्सा राज्य सरकारचा ठेवून ४९ टक्क्यांचा भाग विक्रीस काढून त्यास पेट्रोलियम कंपन्यांप्रमाणे काॅर्पोरेट स्वरूप दिले पाहिजे.

 उत्पन्न आणि उत्पादन खर्च याचा ताळमेळ न लागल्यामुळे दूध उत्पादकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने भेसळखोरांवर कडक कारवाई केली तर बाजारातील किमान २० टक्के दूध कमी होऊ शकते. राज्यात सध्या १ कोटी ४५ लाख २१ हजार गायीच्या दुधाचे संकलन होते. ८९ लाख लिटर दूध हे पॅकिंगमधून विक्री होत असून उपपदार्थांसाठी २४ लाख लिटर व ३२ लाख लिटर दूध हे पावडर करण्यासाठी वापरले जाते. 

टॅग्स :milkदूध