शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

दूध आणि खाद्यपदार्थांत भेसळ केल्यास दंड, आजन्म कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 03:14 IST

खाद्यपदार्थ किंवा पेयामध्ये अपायकारक होणारी भेसळ केल्यास संबंधितास आजन्म कारावास व दंड या दुरुस्तीचे विधेयक विधानसभेत गुरुवारी गदारोळातच मंजूर करण्यात आले.

मुंबई : खाद्यपदार्थ किंवा पेयामध्ये अपायकारक होणारी भेसळ केल्यास संबंधितास आजन्म कारावास व दंड या दुरुस्तीचे विधेयक विधानसभेत गुरुवारी गदारोळातच मंजूर करण्यात आले. फौजदारी कायद्याच्या १९७३ मधील पाच कलमांमध्ये त्यासाठी दुरुस्ती करण्यात आली आहे. असे करणारे महाराष्टÑ चौथे राज्य आहे.या दुरुस्तीमुळे भेसळ करणाऱ्याांवर वचक निर्माण होईल व गुन्हे अजामीनपात्र व दखलपात्र होतील. दुधामध्ये भेसळीची प्रकरणे समोर आली होती. भेसळयुक्त वा असुरक्षित अन्न वा बनावट औषधी द्रव्यांसंबधी ज्या गुन्ह्यांचा तपास लागला, त्यातील आरोपींना अटक करणे वा स्थानबद्ध करण्याची गरज असते. मात्र सध्या हे गुन्हे बिनदखली व जामीनपात्र असल्याने पोलीस, अन्न सुरक्षा अधिकारी व एफडीएच्या अधिकाºयांना गुन्ह्याच्या तपासात अडचणी येत होत्या.दुधातील पाण्याची भेसळ ही निकृष्ट दर्जात मोडते. त्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षा नाही. त्यासाठी मूळ कायद्यानुसार शिक्षा होईल, असे बापट म्हणाले. नव्या दुरुस्तीनुसार दंड किती असेल हे स्पष्ट नाही असे, विचारता बापट म्हणाले, दंडाची रक्कम नियम करताना स्पष्ट केले जाईल.कठोर कायदा गरजेचाराज्यात १ एप्रिल २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत एकूण ६०४ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले होते. त्यापैकी ३०२ प्राप्त अहवालामध्ये २१९ नमुने प्रमाणित घोषित झाले.तर ८३ नमुने कमी दर्जाचे होते. कमी दर्जाच्या नमुन्यांसंदर्भात कारवाई करण्यात येत असली तरी यासाठी कठोर कायद्याची गरज होती, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी सांगितले.

टॅग्स :milkदूधfoodअन्नMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभा