डिंभे : बोरघर (ता.आंबेगाव) येथील काळवाडी वस्तीच्या वरच्या बाजूच्या डोंगरास भेगा पडल्याने येथील २० आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जि.प.शाळा घोडेवाडी येथे त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात नुकत्याच घडलेल्या माळीण या गावापासून अवघ्या आठ ते दहा कि.मी.च्या अंतरावर असणाऱ्या बोरघरच्या काळेवाडी या १०० त १५० आदिवासी लोकवस्ती असणा-या वाडीच्या वरच्या बाजूला असणा-या डोंगरासही मोठी भेग पडली आहे. येथील २ ते ३ घरांनाही भेगा पडल्या आसल्याची माहीती येथील ग्रामस्थांनी दिली आहे. माळीण घटनेच्या पार्श्वभूमीवर काळवाडी येथील नागरीकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. दक्षतेचा उपाय म्हणून वाडीतील १५० लोकांना जि. प. शाळा घोडेवाडी येथे स्थलांतरी केले असल्याची माहीती शरद सहकारी बँकेचे संचालक गणपत कोकणे व बोरघरचे सरपंच संजय शेळके यांनी दिली आहे. आहुपे म्हणून आंबेगाव तालुक्यातील शेवटच्या गावात साखरमाचीवाडी आहे. तेथे जमीन सरकली होती. त्याचे ठाणे जिल्हयात पुनर्वसन करावे असा प्रस्ताव शासनाकडे आहे. पंचाळे खुर्द या गावात जमीन खचल्याने पुनर्वसन करावे असे ठरले होते. पण आदिवासी आपला परीसर सोडून जायला तयार नसतो. माळीण गांव डिंभे पुनर्वसनामध्ये नाही ते पुर्वीपासून तेथेच आहे. नदीकडेला जी जमीन आहे तेवढी धरणात गेली आहे.
आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर
By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST