शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधीच्या चर्चेचे ढोलताशे!

By admin | Updated: June 16, 2017 04:36 IST

शेतकऱ्यांचा संप सुरू असताना काही जण माझे सरकार खाली खेचण्याची भाषा करीत होते. मध्यावधी निवडणुकीची आमचीही तयारी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांचा संप सुरू असताना काही जण माझे सरकार खाली खेचण्याची भाषा करीत होते. मध्यावधी निवडणुकीची आमचीही तयारी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेसह विरोधी पक्षांसमोर राजकीय गुगली टाकली. तर कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असेल, तर राज्यात भूकंप घडवून आणू. यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेगाव येथे दिला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शिवसेनेची धमकी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आजच्या सूचक विधानामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीचे ढोलताशे वाजू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर मध्यंतरी मध्यावधीचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.वृत्तसंस्थेशी बोलताना फडणवीस म्हणाले, कोणी आमच्यावर मध्यावधी निवडणूक लादूच पाहत असेल तर त्यास सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. उद्या मध्यावधी झालीच तर भाजपाचेच सरकार येईल. राज्यातील जनतेचा माझ्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मध्यंतरी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या मोठ्या यशाने ते सिद्धच केले आहे. उद्या निवडणूक झाली तर राज्यातील अलिकडच्या घडामोडींचा भाजपाच्या यशावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यात मध्यावधी होणार असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले नाही. मात्र, उद्या तशी परिस्थिती आलीच तर आमची तयारी आहे एवढेच त्यांनी म्हटले आहे. पक्ष म्हणून निवडणुकीची तयारी नेहमीच ठेवावी लागते, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार सहज निवडून येईल. या निवडणुकीत पाठिंब्याच्या बदल्यात आम्हाला कोणी ‘ब्लॅकमेल’ करू शकत नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नाव न घेता दिला. एनडीएकडे ५४ टक्के मते आजच आहेत आणि अन्य काही पक्षांनी सहकार्याची तयारी दर्शविली असल्याने हा टक्का ६४ पर्यंत जाईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. अमित शहांच्या दौऱ्यात मध्यावधीची चाचपणी!भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे १६ जूनपासून तीन दिवस मुंबईत तळ ठोकून बसणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीची चाचपणी करणार असून या संदर्भात ते मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार व पक्ष पदाधिकाऱ्यांची मतेही जाणून घेऊ शकतात, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सरकार पडू देणार नाही, पण...शेतकरी कर्जमाफीचा विषय बाजूला ठेवायचा असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी शेगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली, त्यांना कर्जमाफी प्रामाणिकपणे मिळवून दिली, तर पाच वर्षे हे सरकार आम्ही पडू देणार नाही. मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल, तर शिवसेना राज्यात भूकंप घडवून आणेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. - नोटाबंदीच्या पापाची परतफेड म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली. मात्र, तत्त्वत: कर्जमाफीवर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही आणि कर्जमाफीची पूर्णत: अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.काँग्रेसही तयार... सत्ताधाऱ्यांना मध्यावधीची घाई झाली असेल, तर काँग्रेसही तयार असून एकदाचा निर्णय घेऊन टाका, असे आव्हान विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी दिले.