शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मध्यावधीच्या चर्चेचे ढोलताशे!

By admin | Updated: June 16, 2017 04:36 IST

शेतकऱ्यांचा संप सुरू असताना काही जण माझे सरकार खाली खेचण्याची भाषा करीत होते. मध्यावधी निवडणुकीची आमचीही तयारी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांचा संप सुरू असताना काही जण माझे सरकार खाली खेचण्याची भाषा करीत होते. मध्यावधी निवडणुकीची आमचीही तयारी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेसह विरोधी पक्षांसमोर राजकीय गुगली टाकली. तर कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असेल, तर राज्यात भूकंप घडवून आणू. यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेगाव येथे दिला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शिवसेनेची धमकी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आजच्या सूचक विधानामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीचे ढोलताशे वाजू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर मध्यंतरी मध्यावधीचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.वृत्तसंस्थेशी बोलताना फडणवीस म्हणाले, कोणी आमच्यावर मध्यावधी निवडणूक लादूच पाहत असेल तर त्यास सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. उद्या मध्यावधी झालीच तर भाजपाचेच सरकार येईल. राज्यातील जनतेचा माझ्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मध्यंतरी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या मोठ्या यशाने ते सिद्धच केले आहे. उद्या निवडणूक झाली तर राज्यातील अलिकडच्या घडामोडींचा भाजपाच्या यशावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यात मध्यावधी होणार असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले नाही. मात्र, उद्या तशी परिस्थिती आलीच तर आमची तयारी आहे एवढेच त्यांनी म्हटले आहे. पक्ष म्हणून निवडणुकीची तयारी नेहमीच ठेवावी लागते, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार सहज निवडून येईल. या निवडणुकीत पाठिंब्याच्या बदल्यात आम्हाला कोणी ‘ब्लॅकमेल’ करू शकत नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नाव न घेता दिला. एनडीएकडे ५४ टक्के मते आजच आहेत आणि अन्य काही पक्षांनी सहकार्याची तयारी दर्शविली असल्याने हा टक्का ६४ पर्यंत जाईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. अमित शहांच्या दौऱ्यात मध्यावधीची चाचपणी!भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे १६ जूनपासून तीन दिवस मुंबईत तळ ठोकून बसणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीची चाचपणी करणार असून या संदर्भात ते मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार व पक्ष पदाधिकाऱ्यांची मतेही जाणून घेऊ शकतात, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सरकार पडू देणार नाही, पण...शेतकरी कर्जमाफीचा विषय बाजूला ठेवायचा असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी शेगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली, त्यांना कर्जमाफी प्रामाणिकपणे मिळवून दिली, तर पाच वर्षे हे सरकार आम्ही पडू देणार नाही. मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल, तर शिवसेना राज्यात भूकंप घडवून आणेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. - नोटाबंदीच्या पापाची परतफेड म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली. मात्र, तत्त्वत: कर्जमाफीवर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही आणि कर्जमाफीची पूर्णत: अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.काँग्रेसही तयार... सत्ताधाऱ्यांना मध्यावधीची घाई झाली असेल, तर काँग्रेसही तयार असून एकदाचा निर्णय घेऊन टाका, असे आव्हान विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी दिले.