शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

MHADA Lottery 2022: मुंबई-पुण्यात घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:38 IST

MHADA Lottery 2022: येत्या दिवाळीला 'म्हाडा'द्वारे 3000 घरांची सोडत निघणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

मुंबई: नवीन घर घेणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये आपले घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, अव्वाच्या सव्वा किमतीमुळे या ठिकाणी घर घेणे परवडत नाही. परंतू, म्हाडाअंतर्गत अनेकांचे शहराच्या ठिकाणी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होते. आता लवकरच म्हाडा नवीन घरांची सोडत काढणार आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली.

जितेंद्र आव्हाडांनी म्हाडाच्या प्रकल्पाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत त्यांनी ट्विटरवरुन माहितीही दिली. 'पहाडी गोरेगाव, मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली. लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील. येत्या दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल,' अशी माहिती आव्हाडांनी ट्विटरवरुन दिली. 

पुणे विभागाची सोडतयेत्या दिवाळीत मुंबई विभागात तीन हजार घरांची लॉटरी निघणार आहे. याशिवाय, म्हाडाच्या पुणे विभागासाठी साडेचार हजारांपेक्षा जास्त घरांची सोडत निघणार आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हाडाचे पुणे विभागाचे अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले की, पुणे विभागासाठी 4 हजार 744 घरांची सोडत निघणार आहे. यासंदर्भातील जाहिरातही काही दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल. 

अंबरनाथमध्ये म्हाडा उभारणार टाऊनशिप- जितेंद्र आव्हाडदरम्यान, अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातील सर्वांत मोठी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या 200 एकर जागेचे गुरुवारी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

राज्यातील सर्वात मोठी टाऊनशिपमुंबई आणि उपनगर परिसराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, हा वाढता भार मुंबईला पेलवणारा नाही. त्यात सध्या डोंबिवलीपुढे, म्हणजे फक्त अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे या परिसरात म्हाडाकडून मेगा टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले. ही टाऊनशिप आजवर म्हाडाने उभारलेल्या टाऊनशिपपैकी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टाऊनशिप असेल, असे आव्हाड म्हणाले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmhadaम्हाडा