शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

प्रत्येक जिल्ह्यात म्हाडाची वसाहत!

By admin | Updated: December 12, 2014 02:00 IST

प्रत्येक जिल्ह्यात म्हाडातर्फे वसाहत उभी केली जाईल, त्यात मध्यमवर्गीयांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध होतील,

अतुल कुलकर्णी
नागपूर: प्रत्येक जिल्ह्यात म्हाडातर्फे वसाहत उभी केली जाईल, त्यात मध्यमवर्गीयांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध होतील, त्यासाठी गृहनिर्माण विभागाने काम सुरु केले असून येत्या काही महिन्यात त्याचे पक्के स्वरुप आम्ही जनतेपुढे मांडू, असे सांगून गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता म्हणाले, सरकारने पाच वर्षात 11 लाख घरे बांधण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी धोरणात बदल करुन मर्यादित काळात प्रकल्पांच्या मंजुरी तातडीने कशा मिळतील यासाठी आपला विभाग प्रयत्नात असल्याचेही मेहता यावेळी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
 
प्रश्न : ही योजना कधी अमलात येईल?
मेहता : काही जिल्ह्यात म्हाडाचे काम चांगले आहे पण काही जिल्ह्यात अस्तीत्वच नाही. जागा आहेत. पण त्याचा वापर झालेला नाही. अशा सगळ्याचा अभ्यास करुन नियोजन केले जाईल. म्हाडाची परवडणारी घरे हा 11 लाख घरांच्या योजनेचा एक भाग आहे.
प्रश्न : मुंबईत एसआरए योजना भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. अनेक बिल्डरांनी जमिनीवर डोळा ठेवून योजना घेतल्या. त्याचे काय?
मेहता : एसआरएमध्ये कमिटय़ामधून वाद झाले. 7क् टक्के झोपडीधारक कोणाकडे आहेत यावरुन दोन गट पडले. काही ठिकाणी दोन्ही बिल्डरांना सह्या दिल्या. पात्रता निश्चितीच्यावेळी हे प्रकार लक्षात आले. 
प्लॅनिंग अॅथॉरिटीकडे प्रकरण रखडले. मनी पॉवरचा वाढता प्रभाव कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न चालू आहे. काही ठिकाणी गैरप्रकार नक्की झाले आहेत. ते दूर करण्यासाठी कायम स्वरुपी पारदर्शक पध्दती आखली जाईल.
प्रश्न : म्हाडावर नियंत्रण आणण्यासाठी काय करणार? अधिकारी आणि दलाल यांचे कुरण म्हणून म्हाडाची ओळख बनली आहे?
मेहता : निश्चित कालावधीत योजना पूर्ण झाल्या तर अनेक प्रश्न मार्गी लागतील. म्हाडा यासाठी फ्रेमवर्क बनवणार आहे. त्यामुळे येत्या काळात निश्चित आपल्याला बदल दिसून येतील. 
शिवाय दिलेल्या मुदतीत एसआरए योजना पूर्ण झाली तर त्याचे कोणकोणते फायदे आहेत हेच मुळात या योजनेत असणा:यांना माहिती नाही. यासाठी आम्ही प्रसार माध्यमांचा वापर करुन जनतेर्पयत जाणार आहोत. ज्या मोठय़ा खाजगी ट्रस्टच्या जागा आहेत व त्या जागा झोपडय़ांनी अतिक्रमीत झाल्या आहेत अशा 3 हजार हेक्टर जागेसाठी आम्ही ट्रस्टना नोटीसा  देणार आहोत. 
तीन महिन्यात जर त्यांनी काही केले नाही तर पुन्हा दोन महिन्याची मुदत दिली जाईल. नंतरही काही झाले नाही तर त्या जागा ताब्यात घेतल्या जातील. (प्रतिनिधी)