शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांसाठी मेट्रो धावली रे..

By admin | Updated: June 8, 2014 17:39 IST

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणा-या मेट्रो रेल्वेचे रविवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ८ - मुंबईकरांचा प्रवास सुखकर व वेगवान करणा-या मेट्रो रेल्वेचे रविवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दुपारी एक वाजल्या पासून मेट्रो सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मेट्रोमुळे घाटकोपर ते अंधेरी हा १२ किलोमीटरचा प्रवास अवघ्या २१ मिनीटात पूर्ण होणार आहे. 

भीषण वाहतूक कोंडीमुळे घाटकोपर ते अंधेरी हे १२ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठीतब्बल एक ते दीड तास वाया जात होता. यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी एमएमआरडीएने रिलायन्सच्या माध्यमातून मेट्रो रेल्वे सुरु केली आहे. रविवारी सकाळी बहुप्रतिक्षीत मेट्रो रेल्वे प्रत्यक्षात ट्रॅकवरुन धावली. सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्सोवा स्थानकाहून   मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मोटरमनच्या डब्यातून मेट्रोचा प्रवास अनुभवला. प्रवासानंतर घाटकोपर स्थानकावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. 'प्रचंड वर्दळ असलेल्या या मार्गावर मेट्रोसाठी बांधकाम करणे हे एक आव्हानच होते. मात्र अशा असंख्य तांत्रिक अडचणींवर मात करत हा प्रकल्प आज पूर्ण झाला. मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण झाले अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार किरीट सोमेय्या, गोपाळ शेट्टी आदी मान्यवरांनीही मेट्रोतून प्रवास केला. 

तिकीटाचा वाद सोडवणार

रिलायन्स, एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोचा प्रकल्प वापरा, बांधा व वापरा तत्त्वावर बांधण्यात आला होता. मेट्रो प्रकल्पाची सुरुवात झाल्यावर मेट्रोच्या तिकीटाचे दर ९, ११ व १३ रुपये असे ठरवण्यात आले होते. मात्र रिलायन्सने प्रकल्प खर्चात वाढ झाल्याने हे दर थेट १०,२०,३० आणि ४० रुपयांपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रोचा प्रवास महाग झाल्यास सर्वसामान्य मुंबईकरांना या सेवेचा फायदा होणार नाही हे स्पष्ट होते. याविरोधात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तिकीटाच्या दराविषयी पत्रकार परिषदेत विचारणा केली असता मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, तिकीटदराविषयी करार करताना मेट्रो अ‍ॅक्ट अस्तित्वात नव्हता. मात्र आता या कलमानुसार तिकीट दर असतील. यासाठी रिलायन्ससोबत चर्चा सुरु आहे. तसेच मुंबई मेट्रोला हा कलम लागू करावा की नाही हा वाद आता न्यायालयात गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मेट्रोचा दुसरा व तिसरा टप्पा पाच वर्षांत पूर्ण करु

मेट्रोच्या पहिल्या टप्प्याल सुमारे आठ वर्षाचा कालावधी लागल्याने मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली होती. रविवारी मेट्रोतून प्रवास करणारे भाजप खासदार किरीट सोमेय्या म्हणाले, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला ऐवढी वर्ष लागली. पण आता केंद्रात मोदी सरकार असल्याने मेट्रोचा दुसरा व तिसरा टप्पा अवघ्या पाच वर्षात मार्गी लावू असे आश्वासन सोमेय्या यांनी दिले. 

सुनील खाडे ठरले पहिले प्रवासी

मुंबईतील काँक्रीटच्या जंगलातून धावणा-या, मुंबईतील गगनचुंबी इमारतीचे दर्शन घडवणा-या मेट्रो रेल्वेविषयी मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता आहे. गारेगार व सुरक्षित प्रवास घडवणा-या या मेट्रोतून प्रवास करण्यासाठी रविवारी पहाटेपासून मुंबईकरांनी मेट्रो स्थानकांच्या दिशेने धाव घेतली होती. मेट्रोचे पहिले प्रवासी होण्याचा मान पटकावला आहे तो नालासोपारा येथे राहणा-या सुनील खाडे यांनी. खाडे हे चकाला येथे कामाला आहे. वाहतूक कोडींमुळे मला ब-याचदा अंधेरीहून चकाल्यापर्यंत पायी जावे लागत होते. आता मात्र मी मेट्रोतून प्रवास करणार असून यामुळे माझा वेळ वाचेल असे खाडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे खाडे हे मोनोमधून प्रवास करणारे पहिले प्रवासी होते.