शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा मेसेज धडकला अन् पथक काेरेवाडीत पाेहाेचले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 08:30 IST

एकीकडे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी वाडी, वस्ती अन् तांड्यावरही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, दुसरीकडे धड रस्ता आणि ओढ्यावर पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी फेरले जात आहे.

संताेष मगर तामलवाडी (जि. उस्मानाबाद) :

एकीकडे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी वाडी, वस्ती अन् तांड्यावरही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, दुसरीकडे धड रस्ता आणि ओढ्यावर पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी फेरले जात आहे. जीव मुठीत घेऊन ओढ्याच्या पाण्यातून मार्ग काढत यमगरवाडी येथील शाळा गाठावी लागत हाेती. हा प्रश्न ‘लाेकमत’ने रविवारच्या अंकात मांडला असता, त्याची थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने दखल घेतली. सचिव श्रीकर परदेशी यांनी स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले अन् हे पथक सकाळीच गावात दाखल झाले. थाेडाही विलंब न करता पथकाने अहवालही सादर केला आहे.  

तुळजापूर तालुक्यातील कोरेवाडीत चाैथीपर्यंतच शिक्षणाची साेय आहे. त्यामुळे पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना यमगरवाडी येथे जावे लागते. काेरेवाडी ते यमगरवाडी या दाेन्ही गावांमध्ये अवघे दाेन ते अडीच किलाेमीटर एवढेच अंतर आहे. परंतु, गावाला लागूनच भलामाेठा ओढा आहे. हा ओढा तलावाच्या पायथ्याशी असल्याने नेहमी पाणी असते. पाऊस पडल्यानंतर पूर येताे. अशा पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. ओढ्यावर पूल उभारावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, कुणीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. विद्यार्थ्यांची शिक्षणासाठीची ही जीवघेणी कसरत ‘लाेकमत’ने मांडली. या वृत्ताची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने घेतली. 

तातडीने दिला ९ पानी अहवाल : सचिव श्रीकर परदेशी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ‘लाेकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तासह मेसेज धाडत स्वतंत्र पथक पाठवून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हा आदेश धडकताच समग्र शिक्षण विभागाचे कार्यकारी अधिकारी आर. बी. राऊत, विस्तार अधिकारी मल्हारी माने यांचे पथक थेट गावात दाखल झाले. ग्रामस्थांसह पालकांना साेबत घेऊन ओढ्याच्या ठिकाणी गेले. तेथील परिस्थितीची पाहणी केली. थाेडाही विलंब न करता जवळपास ९ पानी अहवाल त्यांनी वरिष्ठांना सादर केला आहे. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबाद