शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मराठा समाजाच्या प्रश्नावर नव्या वर्षात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 07:02 IST

मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर संबंधित विभागाचे मंत्री आणि सचिव हे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीसोबत चर्चा करतील

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर संबंधित विभागाचे मंत्री आणि सचिव हे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीसोबत चर्चा करतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीसोबत मंगळवारी मंत्रालायत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी तसे आश्वासित केल्याचा दावा कोअर कमिटीमधील समन्वयक रघुनाथ चित्रे पाटील यांनी केला.आरक्षणासह शैक्षणिक व आर्थिक योजनांचे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी कोअर कमिटीला चर्चेला बोलावत संबंधित विषयांवर तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच आरक्षणाच्या प्रश्नावरही विधि सल्लागारांसोबत चर्चा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, अशी माहिती चित्रे पाटील यांनी दिली.दरम्यान, मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत गरजू मराठा बांधवांना बिनव्याजी कर्जवाटपाची योजना पुरती फसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर-पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाला वैधानिक व घटनात्मक संरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करत, राज्यघटनेच्या परिशिष्ट ९मध्ये समावेश करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने तातडीने केंद्र शासनाकडे शिफारस करण्याची गरज आहे. याशिवाय मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय ५०० विद्यार्थी क्षमतेची वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अवघ्या ५ जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांत ही योजना ठप्प पडली आहे. त्यातही सुरू असलेली वसतिगृहे कमी विद्यार्थी क्षमतेची व दुरवस्थेत आहेत. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेण्यास तयार नाहीत. परिणामी, सरकारने वसतिगृहे उभारून चालविण्याची मागणी भोर-पाटील यांनी केली आहे.या वेळी समन्वयक माऊली पवार म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बेरोजगार मराठा तरुणांना कर्जवाटप होत असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र, तो साफ खोटा आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातून ३ हजारांहून अधिक कर्ज प्रकरणासाठी अर्ज केले आहेत. मात्र, त्यातील ५०हून कमी लोकांची प्रकरणे मंजूर झाली असून, प्रत्यक्षात लोकांच्या हाती रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने समाजाची दिशाभूल करण्याऐवजी योजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन पवार यांनी केले.६ जानेवारीला राज्यव्यापी बैठकसरकारने कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी देण्यासह मराठा समाजाच्या प्रमुख २० मागण्यांवर ठोस निर्णय व अंमलबजावणी करावी. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने ६ जानेवारी, २०१९ला राज्यव्यापी बैठकीचे आयोजन केले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण